आरोग्य

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे.

पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन फार गुणकारी असते. तुपाचे फायदे आपण जाणून आहोत. आहारामध्ये तूप असायलाच हवे. तूप फार पौष्टिक असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पाहा कसे प्यायचे.

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर चांगले साजुक तूप घाला. ते ढवळा आणि मग ते पाणी पिऊन टाका. लहान भांडे प्यायले तरी चालेल. चव अगदीच वाईट लागत नाही. त्यामुळे हे पाणी पिणे नक्कीच त्रासाचे नाही.

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असाल तर मग हा एक उपाय कराच. नक्की फरक जाणवेल. रोज सकाळी गरम पाण्यातून तूप घ्यायचे. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र त्यासोबत चांगला आहार घ्यायला हवा. व्यायामही करायला हवा. इतरही गोष्टी चांगल्या हव्यात. न चुकता रोज असे पाणी प्यायल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागेल.

गरम पाणी व तुपाचे मिश्रण आतड्यांसाठी वंगणाचे काम करते.

पचनाचे काही त्रास असतील तर त्यावर तूप पाणी पिणे हा मस्त उपाय आहे. पचन क्रिया सुधारते तसेच जर पोट साफ होत असेल तर त्या समस्येचेही निवारण होते. पोटाच्या त्रासांवर हे पाणी अगदी गुणकारी आहे.

हार्मोनल बदलांसाठी तसेच हार्मोंन्सचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी तूप पाणी उपयुक्त ठरते. पाळीचे काही त्रास असतील तर ते ही बरे होतात.

त्वचेसाठी असे पाणी फार फायदेशीर ठरते. मुळात त्वचेसाठी तूप चांगले असते. त्वचा छान मऊ मुलायम होते. तसेच काही डाग फोड राहत नाहीत. त्वचाच नाही तर केसही चांगले मऊ व छान होतात.

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी हे पाणी मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

6 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

6 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

7 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

7 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

8 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

11 तास ago