आरोग्य

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे.

पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन फार गुणकारी असते. तुपाचे फायदे आपण जाणून आहोत. आहारामध्ये तूप असायलाच हवे. तूप फार पौष्टिक असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पाहा कसे प्यायचे.

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर चांगले साजुक तूप घाला. ते ढवळा आणि मग ते पाणी पिऊन टाका. लहान भांडे प्यायले तरी चालेल. चव अगदीच वाईट लागत नाही. त्यामुळे हे पाणी पिणे नक्कीच त्रासाचे नाही.

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असाल तर मग हा एक उपाय कराच. नक्की फरक जाणवेल. रोज सकाळी गरम पाण्यातून तूप घ्यायचे. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र त्यासोबत चांगला आहार घ्यायला हवा. व्यायामही करायला हवा. इतरही गोष्टी चांगल्या हव्यात. न चुकता रोज असे पाणी प्यायल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागेल.

गरम पाणी व तुपाचे मिश्रण आतड्यांसाठी वंगणाचे काम करते.

पचनाचे काही त्रास असतील तर त्यावर तूप पाणी पिणे हा मस्त उपाय आहे. पचन क्रिया सुधारते तसेच जर पोट साफ होत असेल तर त्या समस्येचेही निवारण होते. पोटाच्या त्रासांवर हे पाणी अगदी गुणकारी आहे.

हार्मोनल बदलांसाठी तसेच हार्मोंन्सचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी तूप पाणी उपयुक्त ठरते. पाळीचे काही त्रास असतील तर ते ही बरे होतात.

त्वचेसाठी असे पाणी फार फायदेशीर ठरते. मुळात त्वचेसाठी तूप चांगले असते. त्वचा छान मऊ मुलायम होते. तसेच काही डाग फोड राहत नाहीत. त्वचाच नाही तर केसही चांगले मऊ व छान होतात.

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी हे पाणी मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago