आरोग्य

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे.

पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन फार गुणकारी असते. तुपाचे फायदे आपण जाणून आहोत. आहारामध्ये तूप असायलाच हवे. तूप फार पौष्टिक असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पाहा कसे प्यायचे.

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर चांगले साजुक तूप घाला. ते ढवळा आणि मग ते पाणी पिऊन टाका. लहान भांडे प्यायले तरी चालेल. चव अगदीच वाईट लागत नाही. त्यामुळे हे पाणी पिणे नक्कीच त्रासाचे नाही.

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असाल तर मग हा एक उपाय कराच. नक्की फरक जाणवेल. रोज सकाळी गरम पाण्यातून तूप घ्यायचे. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र त्यासोबत चांगला आहार घ्यायला हवा. व्यायामही करायला हवा. इतरही गोष्टी चांगल्या हव्यात. न चुकता रोज असे पाणी प्यायल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागेल.

गरम पाणी व तुपाचे मिश्रण आतड्यांसाठी वंगणाचे काम करते.

पचनाचे काही त्रास असतील तर त्यावर तूप पाणी पिणे हा मस्त उपाय आहे. पचन क्रिया सुधारते तसेच जर पोट साफ होत असेल तर त्या समस्येचेही निवारण होते. पोटाच्या त्रासांवर हे पाणी अगदी गुणकारी आहे.

हार्मोनल बदलांसाठी तसेच हार्मोंन्सचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी तूप पाणी उपयुक्त ठरते. पाळीचे काही त्रास असतील तर ते ही बरे होतात.

त्वचेसाठी असे पाणी फार फायदेशीर ठरते. मुळात त्वचेसाठी तूप चांगले असते. त्वचा छान मऊ मुलायम होते. तसेच काही डाग फोड राहत नाहीत. त्वचाच नाही तर केसही चांगले मऊ व छान होतात.

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी हे पाणी मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

5 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

7 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago