आरोग्य

टपरीवर डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पिणं अत्यंत धोकादायक; ‘या’ गंभीर आजारांना आमंत्रण

दिवसातून अनेक वेळा बरेच लोक चहा घेतात. चहाची तलफ आली की प्रत्येक जण चहा प्यायला जातोच. कॉलेजबाहेर किंवा ऑफिसबाहेर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो चहा आपल्याला हमखास डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा दिला जातो.

चहा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. तसेच यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. याबाबत जाणून घेऊया…

डिस्पोजेबल कपमध्ये चहा पिण्याचे तोटे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डिस्पोजेबल कप पॉलीस्टीरिनपासून बनलेले असतात. गरम चहा प्यायल्यास त्यासोबत हानिकारक पदार्थ शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

चहा प्यायल्याने अनावश्यक थकवा, एकाग्रतेचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने किडनीचं देखील गंभीर नुकसान होऊ शकतं.

गर्भवती महिलांसाठी धोकादायक

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, डिस्पोजेबल ग्लासेसमध्ये मेट्रोसॅमिन, बिस्फेनॉल ए आणि इतर अनेक केमिकल्स असतात, जी शरीरासाठी धोकादायक असतात. त्यामुळे थकवा, ब्लडप्रेशर, शुगर, थायरॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे गरोदर महिलांचं तसेच बाळाचं नुकसान होऊ शकतं.

कॅन्सरचा धोका

डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो, कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक आणि इतर केमिकल्स गरम चहासोबत शरीरात पोहोचतात आणि त्यामुळे गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे हे टाळावे.

हार्मोनल असंतुलन, पाचन समस्या

डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकतं, कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक आणि इतर केमिकल्स शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. गरम चहा प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.

त्वचा, तोंड आणि घशाच्या समस्या

डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने त्वचेला हानी पोहोचते. याशिवाय तोंड आणि घशाचा त्रास होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात.

पर्यावरणाची हानी

डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्यानंतर तो कप फेकून दिला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे प्रदूषण वाढतं, ज्याचा परिणाम पुन्हा मानवी शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

2 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

6 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

7 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

7 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

7 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

9 तास ago