आरोग्य

जास्त पाणी पिणे धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर अधिक जोर असतो. परंतु जास्त पाणी पीने देखील आरोग्यास हानिकारक आहे. शरीरात 70% पाणी असते, त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

हृदय: जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेलियर होऊ शकते, तसेच शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते ज्याचा दबाव हृदयांच्या नसांवर निर्माण होतो. जास्त दबावाने हार्ट फेलियर होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

किडनीचा त्रास: जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आर्जिनिन वॅसोप्रेसिनचा प्लाज्मा स्तर कमी होतो. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात प्यावे. शरीर ओवरहाइड्रेशन झाले तर सोडियमचे प्रमाण देखील कमी होते, त्यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. मेंदूला परिणाम झाल्याने विचार करण्याची क्षमता देखील कमी होते.

यकृत: लोह चे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने देखील ओवरहाइड्रेशन होते, तसेच यकृता संबंधित आजार होऊ शकतात.

जास्त सोडीयम, कमी पोटॅशियम: जास्तीचे सोडीयम आणि कमी प्रमाणात पोटॅशियमच्या सेवनामुळे जास्त तहान लागते. जास्त प्रमाणात मिठ खात असल्यास शरीर जास्तीच्या पाण्याची मागणी करते. जास्त मिठ खाल्याने शरिरातील सेल्स मधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतं. जास्त पाणी पिल्याने ओवरहायड्रेशन होते. यामुळे उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडते. उदा. भ्रम किंवा विचलन अशा समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे आदर्श मानलं जातं. व्यक्तीची उंची, वजन, व्यायामाची पद्धत यावरुन पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

10 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

10 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

12 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

16 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

16 तास ago