आरोग्य

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते, ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते.

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. व्हिटॅमिन्सची आणि मिनिरल्सच्या असंतुलनामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. असे अनेक व्हिटॅमिन्स आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते.

जास्त झोप का येते

व्हिटॅमिन डी

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतं तेव्हा झोपेचा त्रास होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते. जेव्हा व्हिटॅमिन डी कमी असतं तेव्हा शरीरात कॅल्शियम-फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे हाडांमध्ये वेदना होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळस जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील जास्त झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा व्हिटॅमिन बी १२ कमी असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप झोप येऊ लागते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला आळशी वाटतं. तुम्हाला दिवसभर झोप येते. म्हणून, व्हिटॅमिन बी १२ समृद्ध आहार घ्या. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ कमी असते.

केवळ व्हिटॅमिन डी आणि बी१२च नाही तर इतर अनेक पोषक घटक झोपेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न सारख्या मिनरल्सचा समावेश आहे. त्यांच्या कमतरतेमुळे शरीरात आळस, थकवा आणि अशक्तपणा येतो. यामुळे तुम्हाला दिवसभर झोप येते. जर तुम्हाला बराच काळ असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

17 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago