मुंबई: महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करुन घोषणा केली.
महत्वाच्या घोषणा
5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांत 2 सेवा केंद्रे
5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत 4 सेवा केंद्रे
महानगरपालिका क्षेत्रात अधिक केंद्रे उपलब्ध
सेवा शुल्क ₹20 वरून ₹50 होणार
घरपोच सेवा सुरू – ₹100 शुल्क
नवीन सेवा शुल्काचे वाटप
राज्य सेतू केंद्र: 5% (₹2.5)
महाआयटी: 20% (₹10)
जिल्हा सेतू सोसायटी: 10% (₹5)
VLE (सेवा केंद्र चालक): 65% (₹32.50)
घरपोच सेवा शुल्क – ₹100 प्रति नोंदणी
प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क – ₹50
आपले सेवा केंद्र घेण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता तुम्हीही सेवा केंद्र चालक (VLE) बनून अधिकृतपणे शासकीय सेवा देऊ शकता._
पात्रता आणि अटी
शिक्षण: किमान 10वी उत्तीर्ण
वय: 18 वर्षे किंवा त्याहून अधिक
संगणक ज्ञान आवश्यक
केंद्र सुरू करण्यासाठी जागा आवश्यक
इंटरनेट आणि प्रिंटर सुविधा असणे गरजेचे
नोंदणी प्रक्रिया
स्टेप 1: आपले सरकार सेवा केंद्राच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या
स्टेप 2: नवीन VLE नोंदणी पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3: तुमचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक माहिती भरा
स्टेप 4: आवश्यक दस्तऐवज अपलोड करा
स्टेप 5: अर्ज सबमिट करा आणि पडताळणीसाठी प्रतीक्षा करा
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड / पॅन कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्रे
रहिवासी पुरावा
दुकान भाडे करारनामा / मालकी हक्क पत्र
पासपोर्ट साइज फोटो
परवानगी आणि प्रशिक्षण
अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जाईल
सेवा केंद्रासाठी अधिकृत परवाना मिळेल
केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर आणि लॉगिन माहिती मिळेल
सेवा केंद्र सुरू करून काय मिळणार
शासनमान्य सरकारी सेवा पुरवण्यासाठी अधिकृत परवाना
शासकीय सेवा शुल्कातून उत्पन्न मिळण्याची संधी
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…
दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…