दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून…
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून दुपारच्या जेवणात काय खाल्ल्याने आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात हे दोन पदार्थ समाविष्ट केले तर झोप न येता तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काम करायला उत्साह येईल.
कोणते आहेत ते दोन पदार्थ...
१) साजूक तूप: शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ आणि बी – १२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरुर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेश, बद्धकोष्टता यासारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरेल. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
२) चटणी: दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबऱ्याची, नारळाची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणांत खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा…
१) दिवसभरात पुरेशा प्रमाणांत पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
२) ऑफिसममध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.
३) दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट – तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.
४) गरजेपेक्षा जास्त जेवू नये. दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.
५) दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणांत खावा. जास्त खाणे टाळावे.
(सोशल मीडियावरून साभार)