आरोग्य

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही…

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करुन पाहतो. असे असले तरीही काहीजणांना दुपारची झोप ऑफिसमध्ये आवरताच येत नाही. जेवणानंतर काहीजणांना झोप येते, आळस आल्यासारखे वाटते, काम करू नये, थकवा वाढतो, चीडचीड होते. जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, दुपारच्या जेवणात दोन पदार्थ हमखास खाण्याचा सल्ला दिला आहे.
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून…
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून दुपारच्या जेवणात काय खाल्ल्याने आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात हे दोन पदार्थ समाविष्ट केले तर झोप न येता तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काम करायला उत्साह येईल.
कोणते आहेत ते दोन पदार्थ...
१) साजूक तूप: शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ आणि बी – १२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरुर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेश, बद्धकोष्टता यासारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरेल. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
२) चटणी: दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबऱ्याची, नारळाची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणांत खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा…
१) दिवसभरात पुरेशा प्रमाणांत पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
२) ऑफिसममध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.
३) दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट – तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.
४) गरजेपेक्षा जास्त जेवू नये. दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.
५) दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणांत खावा. जास्त खाणे टाळावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

17 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

17 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

21 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

22 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

22 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

22 तास ago