आरोग्य

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही…

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करुन पाहतो. असे असले तरीही काहीजणांना दुपारची झोप ऑफिसमध्ये आवरताच येत नाही. जेवणानंतर काहीजणांना झोप येते, आळस आल्यासारखे वाटते, काम करू नये, थकवा वाढतो, चीडचीड होते. जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, दुपारच्या जेवणात दोन पदार्थ हमखास खाण्याचा सल्ला दिला आहे.
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून…
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून दुपारच्या जेवणात काय खाल्ल्याने आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात हे दोन पदार्थ समाविष्ट केले तर झोप न येता तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काम करायला उत्साह येईल.
कोणते आहेत ते दोन पदार्थ...
१) साजूक तूप: शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ आणि बी – १२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरुर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेश, बद्धकोष्टता यासारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरेल. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
२) चटणी: दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबऱ्याची, नारळाची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणांत खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा…
१) दिवसभरात पुरेशा प्रमाणांत पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
२) ऑफिसममध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.
३) दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट – तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.
४) गरजेपेक्षा जास्त जेवू नये. दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.
५) दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणांत खावा. जास्त खाणे टाळावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

7 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

11 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

12 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

12 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

12 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

12 तास ago