मुंबई: काल गोवंडीत प्रचारासाठी असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नवाब मलिक यांच्याकडे गोवंडीतील अनेक महिलांनी आपल्या मुलांना नशेतून बाहेर काढण्यासाठी आर्त हाक घातली. आमची मुलं नशेत आपलं आयुष्य बरबाद करत असून कुटुंब संपायला लागल्याची बाब नवाब मलिक यांच्या निदर्शनास त्या महिलांनी आणून दिली. शिवाय आमच्या मुलांना वाचवा, अशी विनवणीही या महिला करताना दिसल्या.
ड्रग्जच्या विळख्यात इथले तरुण अडकले असून गोवंडीला नशेपासून मुक्त करा अशी मागणीही या महिलांनी केली. “हमारे बच्चे नशे की लत में डूबे हुए हैं। त्यामुळे कुटूंबाचा आनंद संपला आहे. याशिवाय समाजातील पतही संपायला लागली आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मुलांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही केली.
यावेळी नवाब मलिक यांनी गोवंडीला नशामुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. त्यासाठी एक प्रभावी योजना बनवली जाईल असा शब्द त्या महिलांना दिला. दरम्यान नशामुक्त गोवंडी करण्यासाठी सरकारसोबतच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…