मुंबई: काल गोवंडीत प्रचारासाठी असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नवाब मलिक यांच्याकडे गोवंडीतील अनेक महिलांनी आपल्या मुलांना नशेतून बाहेर काढण्यासाठी आर्त हाक घातली. आमची मुलं नशेत आपलं आयुष्य बरबाद करत असून कुटुंब संपायला लागल्याची बाब नवाब मलिक यांच्या निदर्शनास त्या महिलांनी आणून दिली. शिवाय आमच्या मुलांना वाचवा, अशी विनवणीही या महिला करताना दिसल्या.
ड्रग्जच्या विळख्यात इथले तरुण अडकले असून गोवंडीला नशेपासून मुक्त करा अशी मागणीही या महिलांनी केली. “हमारे बच्चे नशे की लत में डूबे हुए हैं। त्यामुळे कुटूंबाचा आनंद संपला आहे. याशिवाय समाजातील पतही संपायला लागली आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मुलांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही केली.
यावेळी नवाब मलिक यांनी गोवंडीला नशामुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. त्यासाठी एक प्रभावी योजना बनवली जाईल असा शब्द त्या महिलांना दिला. दरम्यान नशामुक्त गोवंडी करण्यासाठी सरकारसोबतच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…