मुंबई: काल गोवंडीत प्रचारासाठी असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नवाब मलिक यांच्याकडे गोवंडीतील अनेक महिलांनी आपल्या मुलांना नशेतून बाहेर काढण्यासाठी आर्त हाक घातली. आमची मुलं नशेत आपलं आयुष्य बरबाद करत असून कुटुंब संपायला लागल्याची बाब नवाब मलिक यांच्या निदर्शनास त्या महिलांनी आणून दिली. शिवाय आमच्या मुलांना वाचवा, अशी विनवणीही या महिला करताना दिसल्या.
ड्रग्जच्या विळख्यात इथले तरुण अडकले असून गोवंडीला नशेपासून मुक्त करा अशी मागणीही या महिलांनी केली. “हमारे बच्चे नशे की लत में डूबे हुए हैं। त्यामुळे कुटूंबाचा आनंद संपला आहे. याशिवाय समाजातील पतही संपायला लागली आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मुलांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही केली.
यावेळी नवाब मलिक यांनी गोवंडीला नशामुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. त्यासाठी एक प्रभावी योजना बनवली जाईल असा शब्द त्या महिलांना दिला. दरम्यान नशामुक्त गोवंडी करण्यासाठी सरकारसोबतच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…