आरोग्य

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का

सध्या सगळीकडेच वातावरण खूप थंड झाले आहे. काही ठिकाणी तर एवढी थंडी आहे की सगळे अंग गोठून गेल्यासारखे होते. अशा कडाक्याच्या थंडीत आपोआपच मग गरमागरम चहा, कॉफी घेण्याची इच्छा हाेते. त्यातही चहाप्रेमी असतील तर त्यांना भरपूर आलं किंवा दालचिनी, वेलची असं सगळं घालून केलेला वाफाळता, सुगंधी चहा घेण्याची इच्छा होते. चहा घेतला की अंगात उब येऊन थोडी तरतरी येते.. त्यामुळेच तर बऱ्याच लोकांचं चहा पिण्याचं प्रमाण हिवाळ्यात जवळपास दुपटीने वाढलेलं असतं. तुम्हीही थंडीमुळे असा दिवसभरातून वरचेवर चहा घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच..

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलं आहे का

चहा पिण्याचं प्रमाण असं एकदम जास्त वाढलं असेल तर त्याचा निश्चितच तुमच्या आरोग्यावर, पचनसंस्थेवर परिणाम होतो. आपली पचनक्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर चहा घेत असाल तर खाण्यापिण्यातून जे काही पौष्टिक पदार्थ तुमच्या शरीरात आलेले आहेत ते पदार्थ आणि विशेषत: लोह शरीरात पुर्णपणे मिसळण्यात अडथळा येतो. त्यामुळे दुधाचा चहा घेण्याचं प्रमाण नियंत्रितच ठेवा. जर तुम्हाला चहा प्यावाच वाटत असेल तर मग पुढील पद्धतीने चहा करा आणि तो प्या.

चहा प्यायची इच्छा झाली तर कोरा चहा म्हणजेच दूध न टाकता केलेला चहा प्या. दुधाचा चहा दिवसातून एकदा किंवा दोनदा पिणं ठिक आहे. पण तुमचं चहा पिण्याचं प्रमाण त्याहूनही जास्त असेल तर चहामध्ये दूध टाकणं टाळा. त्याऐवजी तुळशीची पानं, आलं, ओवा, गवतीचहा असं टाकून केलेला कोरा चहा घ्या. लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी हा पर्यायही चांगला आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

2 तास ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

4 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

4 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

5 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

5 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

5 तास ago