आरोग्य

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का

सध्या सगळीकडेच वातावरण खूप थंड झाले आहे. काही ठिकाणी तर एवढी थंडी आहे की सगळे अंग गोठून गेल्यासारखे होते. अशा कडाक्याच्या थंडीत आपोआपच मग गरमागरम चहा, कॉफी घेण्याची इच्छा हाेते. त्यातही चहाप्रेमी असतील तर त्यांना भरपूर आलं किंवा दालचिनी, वेलची असं सगळं घालून केलेला वाफाळता, सुगंधी चहा घेण्याची इच्छा होते. चहा घेतला की अंगात उब येऊन थोडी तरतरी येते.. त्यामुळेच तर बऱ्याच लोकांचं चहा पिण्याचं प्रमाण हिवाळ्यात जवळपास दुपटीने वाढलेलं असतं. तुम्हीही थंडीमुळे असा दिवसभरातून वरचेवर चहा घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच..

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलं आहे का

चहा पिण्याचं प्रमाण असं एकदम जास्त वाढलं असेल तर त्याचा निश्चितच तुमच्या आरोग्यावर, पचनसंस्थेवर परिणाम होतो. आपली पचनक्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर चहा घेत असाल तर खाण्यापिण्यातून जे काही पौष्टिक पदार्थ तुमच्या शरीरात आलेले आहेत ते पदार्थ आणि विशेषत: लोह शरीरात पुर्णपणे मिसळण्यात अडथळा येतो. त्यामुळे दुधाचा चहा घेण्याचं प्रमाण नियंत्रितच ठेवा. जर तुम्हाला चहा प्यावाच वाटत असेल तर मग पुढील पद्धतीने चहा करा आणि तो प्या.

चहा प्यायची इच्छा झाली तर कोरा चहा म्हणजेच दूध न टाकता केलेला चहा प्या. दुधाचा चहा दिवसातून एकदा किंवा दोनदा पिणं ठिक आहे. पण तुमचं चहा पिण्याचं प्रमाण त्याहूनही जास्त असेल तर चहामध्ये दूध टाकणं टाळा. त्याऐवजी तुळशीची पानं, आलं, ओवा, गवतीचहा असं टाकून केलेला कोरा चहा घ्या. लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी हा पर्यायही चांगला आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

5 तास ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

6 तास ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

6 तास ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

6 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

6 तास ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

6 तास ago