आरोग्य

उपवासाच्या भगरीचे आरोग्यदायी फायदे…

आपण उपासाच्या दिवशी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ खातो. उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी सहसा आपण भगर खात नाही. भगरीसारखे सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता, आपण त्याचा रोजच्या आहारात उपयोग केला पाहिजे. त्याद्वारे शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहील.

१) लो ग्लायसेमिक इंडेक्स हा आजचा परवलीचा शब्द आहे. म्हणजे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि हे कार्बोहायड्रेट पचायला सोपे असते. भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाणे जास्त चांगले.

२) भगरीमध्ये कॅलरी कमी व प्रोटीन जास्त असते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर उपयुक्त ठरते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

३) भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन हा धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक जणांना अपचन होते. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. पचनाच्या तक्रारी असतील तर आहारात भगरीचा समावेश करावा.

४) भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. पोट भरल्याची भावना लवकर येते. जेवण कमी जाते पण पोट भरते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. गॅसेस होत नाहीत. अपचन होत नाही.

५) लहान बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना भगरीची खीर करून द्यावी. अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून ही खीर दिली तरी चालेल. बाळासाठी हा उत्तम पोषक आहार आहे.

५) इतर धान्यापेक्षा भगरीतून जास्त आयर्न मिळते. ऍनेमियाचा त्रास असेल, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर भगर उपयोगी आहे. १०० ग्राम भगरीतून १८.५ मिलीग्राम आयर्न मिळते.

६) भगरीत सी, ए आणि इ व्हिटॅमिन असतात. तसेच खनिजे सुद्धा असतात. साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी भगर उपयोगी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago