आरोग्य

उपवासाच्या भगरीचे आरोग्यदायी फायदे…

आपण उपासाच्या दिवशी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ खातो. उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी सहसा आपण भगर खात नाही. भगरीसारखे सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता, आपण त्याचा रोजच्या आहारात उपयोग केला पाहिजे. त्याद्वारे शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहील.

१) लो ग्लायसेमिक इंडेक्स हा आजचा परवलीचा शब्द आहे. म्हणजे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि हे कार्बोहायड्रेट पचायला सोपे असते. भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाणे जास्त चांगले.

२) भगरीमध्ये कॅलरी कमी व प्रोटीन जास्त असते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर उपयुक्त ठरते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

३) भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन हा धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक जणांना अपचन होते. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. पचनाच्या तक्रारी असतील तर आहारात भगरीचा समावेश करावा.

४) भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. पोट भरल्याची भावना लवकर येते. जेवण कमी जाते पण पोट भरते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. गॅसेस होत नाहीत. अपचन होत नाही.

५) लहान बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना भगरीची खीर करून द्यावी. अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून ही खीर दिली तरी चालेल. बाळासाठी हा उत्तम पोषक आहार आहे.

५) इतर धान्यापेक्षा भगरीतून जास्त आयर्न मिळते. ऍनेमियाचा त्रास असेल, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर भगर उपयोगी आहे. १०० ग्राम भगरीतून १८.५ मिलीग्राम आयर्न मिळते.

६) भगरीत सी, ए आणि इ व्हिटॅमिन असतात. तसेच खनिजे सुद्धा असतात. साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी भगर उपयोगी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

18 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

18 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

18 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

18 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

2 दिवस ago