आरोग्य

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं काही वेळानं बंद होतं. कारण जखम झालेल्या जागी ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ तयार होते. रक्ताची गाठ तयार होणं किंवा रक्त गोठणं ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी जखमेतून जाणाऱ्या रक्ताला रोखते. पण जेव्हा रक्ताच्या गाठी सामान्यापेक्षा जास्त तयार होतात तेव्हा अनेक समस्यांचा धोका वाढतो. कारण रक्ताच्या गाठी जेव्हा जास्त तयार होतात तेव्हा शरीराच्या आतही रक्ताच्या गाठी तयार होतात. जेव्हा मेंदुमध्ये रक्ताची गाठ तयार होतं किंवा शरीरात तयार झालेली एखादी रक्ताची गाठ मेंदुत जाते तेव्हा जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. अशात काही लक्षणांच्या माध्यमातून याबाबत जाणून घेता येतं. चला जाणून घेऊ अशात काही लक्षणांबाबत जे मेंदुत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे संकेत असू शकतात.

१) अचानक डोकेदुखी

डोकं दुखणं तशी तर फार सामान्य समस्या आहे आणि त्यामुळे याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण तुम्हाला माहीत नसेल की, अचानकपणे डोकं खूप जास्त दुखत असेल तर हा अनेक आजारांचा संकेत असू शकतो. त्यातील एक मेंदुत रक्ताची गाठ असणं हाही असू शकतो.

२) शरीराच्या एका भागात कमजोरी

शरीराच्या एका भागात कमजोरी होणं काही सामान्य लक्षण नाही. हे लक्षण शरीरात एखादा मोठा आजार असल्याचा संकेत असू शकतो. जसे की, लकवा, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन कॅन्सर, ब्रेन ड्यूमर किंवा मेंदुत ब्लड क्लॉट तयार होणं. हे सगळे आजार जीवघेणे आहे. त्यामुळे समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

३) शरीराचं संतुलन बिघडणं

जर तुम्हाला अचानक शरीरात संतुलन ठेवण्यास समस्या येत असेल तर, हाही एक संकेत असू शकतो की, तुमच्या मेंदुत रक्ताची गाठ तयार झाली असेल. मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्यावर अनेक केसेसमध्ये हे पहिलं लक्षण असू शकतं. ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

४) पुन्हा पुन्हा चक्कर येणं

जेव्हा मेंदुत रक्ताची गाठ तयार होते आणि आपण काही कारणाने त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा पुन्हा पुन्हा चक्कर येण्याची समस्या होते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.

५) कन्फ्यूज होणं

जेव्हा मेंदुमध्ये रक्ताची गाठ तयार होऊ लागते तेव्हा मेंदुची काम करण्याची प्रक्रिया प्रभावित होते. त्यामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमताही प्रभावित होते. व्यक्तीला अनेक गोष्टींमध्ये सतत कन्फ्यूजन होत राहतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

22 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

22 तास ago