आरोग्य

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे 

गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं करावं हेही सांगणार आहोत.

१) मसल्स मजबूत होतात:- हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न असतं. आयर्न हेल्दी ब्लड सेल्सला सपोर्ट करण्यात मदत करतं. याने तुमचा थकवा दूर होईल आणि मांसपेशी मजबूत होतील.

२) एनीमियापासून बचाव:- शरीरात आयर्नची कमतरता झाली की, एमीनियाचा धोका वाढतो. ज्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे गूळ आयर्नचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. याचा नियमित आहारात समावेश केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो.

३) आजारांचा धोका कमी होतो:- हिवाळ्यातील तुमच्या रोजच्या आहारात गुळाचा समावेश करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फेनोलिक अॅसिड असतं, ज्यामुळे शरीरावर ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी पडतो.

४) पचन तंत्र चांगलं राहत:- पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. बरेच बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे गुळाचं सेवन करतात.

५) इम्यूनिटी वाढते:- गुळाचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. गुळात असलेल्या पोषक तत्व आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. अशात अनेक जुन्या आजारांना रोखलं जाऊ शकतं.

कसं कराल गुळाचं सेवन

गूळ तुम्ही थेटही खाऊ शकता. जर तुम्हाला थेट गूळ खाणं आवडत नसेल तर याचे गूळ आणि तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही बनवू शकता. तुम्ही रोज २५ ग्रॅम गुळाचं सेवन करू शकता. जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गुळाच्या चहाचं सेवन करतात. महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त गूळ खाल्ल्याने तुम्हाला जुलाब लागू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

14 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

14 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

14 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

14 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

16 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

16 तास ago