आरोग्य

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा?

मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्या उद्भवू शकतात. कानातला मळ काढण्यासाठी काही खास ट्रिक्स वापरल्यास तुमचं काम सोपं होईल.

कानात मळ का तयार होतो.

कानात तयार होणारा मळ म्हणजेच इयर वॅक्स शरीरातील एक नॅच्युरल प्रक्रिया आहे. इअर वॅक्समुळे कानांना धूळ, माती आणि किटाणूंपासून बचाव करण्यास मदत होते. पण जेव्हा जास्त मळ कानात जमा होतो तेव्हा त्रास होतो. लहान मुलांना कानात खाज येणं, वेदना, ऐकायला कमी येणं अशा समस्या उद्भवतात.

या गोष्टींची काळजी घ्या

लहान मुलांचे कान साफ करताना इयर बड्स, बोट, पिंन्स, कापूस असे पदार्थ कानात घालू नयेत. असं केल्यानं वॅक्स आतमध्ये ढकललं जाऊ शकतं. ज्यामुळे कानांचा पडदा खराब होऊ शकतो. याव्यतिरिक्त कानांमध्ये इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि मुलांना लहान वयातच कमी ऐकू येऊ लागतं.

कानांचा मळ कसा स्वच्छ करायचा.

कानात जास्तच मळ साचला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा मळ साफ करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. एक छोटा, स्वच्छ कपडा घ्या. कोमट पाण्यात भिजवून हलका पिळून घ्या. कापडानं मुलांच्या कानातील बाहेरचा भाग हळूहळू स्वच्छ करा. ज्यामुळे मळ सैल होईल आणि आपोआप बाहेर निघेल.

कानात वेदना, खाज, सूज, ऐकायला त्रास होणं अशा समस्या असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. कधी कधी मळ जास्त जमा झाल्यामुळे टुल्स किंवा इयर ड्रॉप्सची आवश्यकता असते. पीडियाट्रिशियन सांगतात की लहान मुलांचे कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कानात कोणतीही वस्तू घालू नये. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

21 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

21 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

21 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

21 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

21 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

21 तास ago