मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्या उद्भवू शकतात. कानातला मळ काढण्यासाठी काही खास ट्रिक्स वापरल्यास तुमचं काम सोपं होईल.
कानात मळ का तयार होतो.
कानात तयार होणारा मळ म्हणजेच इयर वॅक्स शरीरातील एक नॅच्युरल प्रक्रिया आहे. इअर वॅक्समुळे कानांना धूळ, माती आणि किटाणूंपासून बचाव करण्यास मदत होते. पण जेव्हा जास्त मळ कानात जमा होतो तेव्हा त्रास होतो. लहान मुलांना कानात खाज येणं, वेदना, ऐकायला कमी येणं अशा समस्या उद्भवतात.
या गोष्टींची काळजी घ्या
लहान मुलांचे कान साफ करताना इयर बड्स, बोट, पिंन्स, कापूस असे पदार्थ कानात घालू नयेत. असं केल्यानं वॅक्स आतमध्ये ढकललं जाऊ शकतं. ज्यामुळे कानांचा पडदा खराब होऊ शकतो. याव्यतिरिक्त कानांमध्ये इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि मुलांना लहान वयातच कमी ऐकू येऊ लागतं.
कानांचा मळ कसा स्वच्छ करायचा.
कानात जास्तच मळ साचला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा मळ साफ करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. एक छोटा, स्वच्छ कपडा घ्या. कोमट पाण्यात भिजवून हलका पिळून घ्या. कापडानं मुलांच्या कानातील बाहेरचा भाग हळूहळू स्वच्छ करा. ज्यामुळे मळ सैल होईल आणि आपोआप बाहेर निघेल.
कानात वेदना, खाज, सूज, ऐकायला त्रास होणं अशा समस्या असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. कधी कधी मळ जास्त जमा झाल्यामुळे टुल्स किंवा इयर ड्रॉप्सची आवश्यकता असते. पीडियाट्रिशियन सांगतात की लहान मुलांचे कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कानात कोणतीही वस्तू घालू नये. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…
मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…