हार्ट अॅटॅक त्याची कारणं, लक्षणं, उपाय यांबाबत सतत सगळीकडे चर्चा सुरू असते. वेगवेगळे सल्ले दिले जातात. धोका टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. कारण काय तर केवळ भारतातच नाही तर जगभरात हार्ट अॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि यामुळे शेकडो लोकांचा जीव जात आहे. पण इतकी जागरूकता केली जात असूनही बऱ्याच लोकांना याच्या लक्षणांबाबत पुरेशी माहिती नसते. ही लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा छातीत अचानक दुखू लागतं. पण विचार केला जातो की, अॅसिडिटीमुळे असं होत असेल. पण मुळात हे हार्ट अॅटॅकचं सुद्धा लक्षण असू शकतं.
जगभरात दरवर्षी साधारण ६.८ कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव जातो. यातील सगळ्यात जास्त जीव हार्ट डिजीज, स्ट्रोस आणि श्वासासंबंधी आजारांमुळे जातात. भारतात दरवर्षी लाखो लोकांना हार्ट अॅटॅक येतात. जर सुरूवातीची लक्षण आधीच माहीत असली तर धोका टाळता येतो. छातीत वेदना होण्याची कारणं अनेक असू शकतात. ज्यात हार्ट अॅटॅक, अॅसिडिटी, गॅस, मसल्स स्ट्रेन आणि स्ट्रेस यांचा समावेश आहे. पण जर हे दुखणं नेहमी नेहमी होत असेल किंवा त्यासोबत इतरही काही लक्षणं दिसत असेल तर याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
हार्ट अॅटॅक आणि अॅसिडिटीमध्ये फरक
वेदना कुठे जात आहे
सोनिया नारंग सांगतात की, जर दुखणं गळ्यापर्यंत होत असेल तर हे सामान्यपणे अॅसिडिटीचं लक्षण आहे. पण जर दुखणं खांदे, जबडा किंवा डाव्या हातापर्यंत पसरत असेल तर हा हार्ट अॅटॅकचा संकेत असू शकतो.
कसं दुखतंय?
जर छातीत जळजळ होत असेल तर ही अॅसिडिटी आहे. पण जर छातीत जडपणा वाटत असेल, दबाव जाणवत असेल तर हा हार्ट अॅटॅकचा संकेत असू शकतो.
झोपल्यावर वेदना वाढतात की नाही
सोनिया सांगतात की, जर लेटल्यावर वेदना वाढत असेल तर ही अॅसिडिटी आहे. पण जर लेटल्यावर काहीच बदल होत नसेल म्हणजे दुखणं तसंच कायम असेल तर हा हार्ट अॅटॅकचा संकेत असू शकतो.
तोंडाची चव
जर तोंडाची चव कडवट वाटत असेल, ढेकर येत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल तर हे अॅसिडिटीचं लक्षण आहे. पण जर घाम येत असेल, चक्कर येत असेल किंवा दम लागत असेल तर हार्ट अॅटॅक असू शकतो.
अॅसिडिटीवर उपाय
अॅसिडिटी दूर करण्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून प्या.
चिमुटभर ओवा आणि काळं मीठ चावून खा.
जेवण केल्यावर लगेच लेटू नका.
चहा, कॉफी आणि तळलेल्या पदार्थांपासून दूर रहा.
स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करा.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…