आरोग्य

हाय बीपीचा त्रास होत असल्यास ‘या’ तेलाने करा मसाज

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

पायांची दुखणे वाढल्यावर तळव्यांना तेल लावून मसाज करा. यासाठी आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. मोहरीच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात.

स्नायूंना आराम आणि वेदनेपासून दूर

मोहरीचे तेल लावून तळव्यांना मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. यासह नसांवरही सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे पाय किंवा इतर दुखणे दूर होतात. जर आपल्याला पाय किंवा सांधे दुखण्याची समस्या असेल तर, तळव्यांना मोहरीचे तेल लावून मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

झोपेचं चक्र सुधारते

तळवे मसाज करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झोप सुधारते. जर आपलं बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेचं चक्र बिघडलं असेल तर, रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि गाढ झोप येण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

मोहरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जे आपण तळव्यांना तेल लावून मसाज करता, तेव्हा ते शरीरात उष्ण निर्माण करतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.

त्वचेसाठी फायदेशीर

मोहरीचे तेल त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. नियमित मसाज केल्याने तळव्यांची त्वचा मऊ आणि निरोगी राहते. हे तेल मृत त्वचा काढून टाकण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

7 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

8 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

8 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

9 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

9 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

13 तास ago