आरोग्य

जेवण करून लगेचच शतपावली करताय तर थांबा ‘हे’ वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा व्यायाम करणेही टाळावे. म्हणूनच जर तुम्ही जेवणानंतर लगेच चालायला जात असाल आणि शतपावलीपेक्षाही खूप जास्त चालत असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही, अशी माहिती डॉक्टरांनी शेअर केली आहे.

जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच चालत असाल आणि खूप जास्त वेळ चालत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील वात दोषाचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अपचन, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. काही मिनिटांचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. पण फक्त शतपावलीच करा आणि ती ही अगदी सावकाशपणे करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

6 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

7 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

7 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

7 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

7 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

7 तास ago