ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा व्यायाम करणेही टाळावे. म्हणूनच जर तुम्ही जेवणानंतर लगेच चालायला जात असाल आणि शतपावलीपेक्षाही खूप जास्त चालत असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही, अशी माहिती डॉक्टरांनी शेअर केली आहे.
जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच चालत असाल आणि खूप जास्त वेळ चालत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील वात दोषाचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अपचन, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. काही मिनिटांचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. पण फक्त शतपावलीच करा आणि ती ही अगदी सावकाशपणे करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…