dead
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे.
शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे. लहानग्या बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना गहिवरून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील अहिल्यानगर हायवेजवळ, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले (tattoo) असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलिस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलिस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे, आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यात गळफास घेवून युवकाची आत्महत्या…
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…