dead
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे.
शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे. लहानग्या बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना गहिवरून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील अहिल्यानगर हायवेजवळ, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले (tattoo) असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलिस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलिस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे, आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यात गळफास घेवून युवकाची आत्महत्या…
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…