आरोग्य

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत.

भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ करून पाहू शकता. थंडीत काही भाज्या न चुकवता खाल्ल्या पाहिजे. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.

चवळीची भाजी: ज्यांना रक्ताची कमी किंवा अॅनिमियाची समस्या आहे, त्यांनी चवळीची पालेभाजी जरूर खावी. चवळीच्या भाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने हे मुबलक प्रमाणात आढळतात.

चाकवत: चाकवत देखील खूप पौष्टिक आहे. खरं तर यात ८ प्रकारची जीवनसत्त्वेए, बी१ आणि व्हिटॅमिन सी आढळतात. या शिवाय कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम या सारखे पोषक घटक देखील यामध्ये आढळतात.

पालक: पालक ही थंडीच्या दिवसांचा उत्तम सोबती आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई आढळते. या शिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखे पौष्टिक घटक ही त्यात आढळतात.

गाजर: गाजराचा हलवा हिवाळ्यात सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. गाजर हलव्या व्यतिरिक्त, तुम्ही मिक्स व्हेज बनवण्यासाठी देखील गाजर देखील वापरू शकता. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक आढळतात.

बीटरुट: बीटरुट हे फळ आणि भाजी दोन्ही मानले जाऊ शकते. बीटरूट देखील अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर असे अनेक पोषक घटक आढळतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

15 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

24 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

24 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago