आरोग्य

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत.

मोबाईल फोनमधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात. मोबाईल मधून निघणारे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत. मोबाईल फोनमधून जो निळा प्रकाश निघतो. त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.

काय होतात समस्या

मोबाईल फोनमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गयनायझेशन नुसार, फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदुवर गंभीर प्रभाव पडतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी, चिडचिडपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात. मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात. त्यामुळे प्रयत्न करा की, झोपताना फोन दूर ठेवावा. जर तुम्हाला फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंट करून दूर ठेवा. त्याऐवजी आवडीचं एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा.

काही ठिकाणी मोबाईल टाळा

घरात काही ठिकाणं जसे की, जेवणाचा टेबल, झोपण्याची खोली, बाथरूम मोबाईल मुक्त ठेवा. असं केलं तर घरातील लहान मुले देखील या ठिकाणांवर फोन वापरणार नाही.

डिजिटल डिटॉक्स

आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा. याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि तुम्हाला त्यांच्या सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. याने तुमचे संबंध मजबूत होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

1 तास ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

1 तास ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

2 तास ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

2 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

3 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

3 तास ago