फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत.
मोबाईल फोनमधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात. मोबाईल मधून निघणारे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत. मोबाईल फोनमधून जो निळा प्रकाश निघतो. त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.
काय होतात समस्या
मोबाईल फोनमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गयनायझेशन नुसार, फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदुवर गंभीर प्रभाव पडतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी, चिडचिडपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात. मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात. त्यामुळे प्रयत्न करा की, झोपताना फोन दूर ठेवावा. जर तुम्हाला फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंट करून दूर ठेवा. त्याऐवजी आवडीचं एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा.
काही ठिकाणी मोबाईल टाळा
घरात काही ठिकाणं जसे की, जेवणाचा टेबल, झोपण्याची खोली, बाथरूम मोबाईल मुक्त ठेवा. असं केलं तर घरातील लहान मुले देखील या ठिकाणांवर फोन वापरणार नाही.
डिजिटल डिटॉक्स
आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा. याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि तुम्हाला त्यांच्या सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. याने तुमचे संबंध मजबूत होतील.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…