आरोग्य

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत.

मोबाईल फोनमधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात. मोबाईल मधून निघणारे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत. मोबाईल फोनमधून जो निळा प्रकाश निघतो. त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.

काय होतात समस्या

मोबाईल फोनमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गयनायझेशन नुसार, फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदुवर गंभीर प्रभाव पडतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी, चिडचिडपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात. मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात. त्यामुळे प्रयत्न करा की, झोपताना फोन दूर ठेवावा. जर तुम्हाला फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंट करून दूर ठेवा. त्याऐवजी आवडीचं एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा.

काही ठिकाणी मोबाईल टाळा

घरात काही ठिकाणं जसे की, जेवणाचा टेबल, झोपण्याची खोली, बाथरूम मोबाईल मुक्त ठेवा. असं केलं तर घरातील लहान मुले देखील या ठिकाणांवर फोन वापरणार नाही.

डिजिटल डिटॉक्स

आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा. याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि तुम्हाला त्यांच्या सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. याने तुमचे संबंध मजबूत होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

2 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या…

शिरूर: शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची…

8 मिनिटे ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

5 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

5 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

5 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

8 तास ago