आरोग्य

दही खायचं असेल तर कस खाव

1) बद्धकोष्ठता: ज्यांचा कोठा जड असतो आणि पचनशक्ती क्षीण असते अशांनी दही खाल्ले तर पचनक्रिया मंदावण्याची शक्यता असते. तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात.

२) ॲसिडीटी: दही योग्य वेळी खाल्ले नाही तर ॲसिडीटी होऊ शकते. रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी चांगले नसते, त्याने ॲसिडीटीची समस्या उद्भवते.

३) सांधेदुखी: दह्यामध्ये जे प्रोटीन असते त्यामुळे अंगावर सूज येण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

४) ॲलर्जी: दुधाच्या पदार्थांमुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते. दही हाही दुधाचाच पदार्थ असल्याने काहींना खाज येणे, आग होणे, सूज येणे असे त्रास होऊ शकतात.

५) सर्दी-कफ: दही हे थंड प्रकृतीचे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आधीपासून सर्दी-कफ किंवा खोकला असेल तर ते वाढू शकते.

६) वजनवाढ: एकावेळी खूप जास्त दही खाल्ले तर वजनवाढीसारखी समस्याही होऊ शकते. त्यामुळे दही हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे केव्हाही चांगले.

७) रक्तदाब: विकतचे दही प्रोसेस केलेले असल्याने त्यामध्ये सोडीयम असण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात सोडीयम शरीरात गेले तर रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

दही खायचेच असेल तर

खूप आंबट झालेले फ्रिजमध्ये गार केलेले दही खाऊ नये, आधमोरं म्हणजेच ताजं दही खाणे केव्हाही जास्त चांगले.

दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाऊ नये. त्यापेक्षा दही नुसते खायला हवे.

दह्यापेक्षा ताक पिणे आरोग्यासाठी अधिक चांगले असते, त्याचा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे दह्याचे ताक करावे.

दही साधारणपणे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खावे. सूर्यास्तानंतर दही खाणे टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

5 मिनिटे ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

1 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

3 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

4 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

5 तास ago