आरोग्य

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते ते जाणून घेऊ या.

जीवनसत्त्व ‘ए’

चांगल्या नेत्र दृष्टीसाठी ‘ए’ जीवनसत्त्व महत्त्वाचे असते. तसेच शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता टिकून राहण्यासाठी ‘ए’ जीवनसत्त्व फार गरजेचे असते. प्रजनन संस्थेसाठी ही फार महत्त्वाचे असते. हृदय ,आतडी, किडनी यासाठी ही ‘ए’ जीवनसत्त्वाची फार गरज असते. अंड्यातून मोठ्या प्रमाणात ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. मांसाहारातून जास्त प्रमाणात ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. मग शाकाहारी लोकांनी काय करावं? टॉमॅटो मध्येही ‘ए’ जीवनसत्त्व असतं. पण जर शरीरात ‘ए’ जीवनसत्त्वाची कमी आहे. दृष्टी कमी आहे तर, त्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’च्या गोळ्या मिळतात.

‘बी’ जीवनसत्त्व

‘बी’ जीवनसत्त्व खास करून पचनसंस्थे संदर्भात कार्यरत असते. अन्न पचवणे आणि त्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी याची गरज असते. मेंदूसाठी हे फार महत्त्वाचे असते. भाज्या, बिया, मासे आदी मधून ‘बी’ जीवनसत्त्व मिळते. याच्याही गोळ्या मिळतात.

‘सी’ जीवनसत्त्व

हाडांना मजबुती देण्याचे, त्वचेची काळजी घेण्याचे, रक्त स्त्राव सुरळीत चालवण्याचे काम ‘सी’ जीवनसत्त्वाचे असते. पपई, किवी, केळं आदी पदार्थांतून भरपूर ‘सी’ जीवनसत्त्व मिळते. याची ही गोळी मेडीकल ला मिळते.

व्हिटॅमिन्स च्या गोळ्या घ्याव्यात का

या गोळ्या घेणे फायद्याचेच आहे. शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी या गोळ्या चांगला उपाय आहेत. जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी झाले तर, अनेक आजार होतात. त्यामुळे काळजी घ्या. इतरही अनेक जीवनसत्त्व असतात. त्याच्याही गोळ्या मिळतात. या गोळ्या घ्याव्या का नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. या घेण्यात काही धोका नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

6 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

6 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

7 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

12 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

12 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

12 तास ago