आरोग्य

थंडीत हातापायांना येते सूज, मिनिटभर करा ‘या’ तेलाने मालिश

हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारवा वाढला की शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना हातापायांना सूज येणे, बोटे बधिर होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन नीट न होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. ज्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्तभिसरणावर होतो. रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि सांधेदुखी देखील वाढते. अशावेळी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे ठरत नाही, तर शरीराला आतून उष्णता देणारी आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करणारी योग्य काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. योग्य तेलाने नियमित मसाज केल्यास हातापायांतील सूज कमी होण्यास, स्नायूंना आराम मिळण्यास आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होऊ शकते

थंडीच्या दिवसांत या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि शरीरातील ऊब टिकवून ठेवण्यासाठी मालिश हा सर्वात जुना आणि फायदेशीर उपाय मानला जातो. योग्य तेलाने केलेली मालिश केवळ सूजच कमी करत नाही, तर रक्ताभिसरण सुधारून शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी नेमक्या कोणत्या तेलांचा वापर करावा आणि मालिश करण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूयात.

थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी खास तेल… 

थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी खास तेल तयार करण्यासाठी मोहरीचे तेल १/२ कप, १ टेबलस्पून हळद, २ ते ३ लसूण पाकळ्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

तेल तयार करण्याची कृती… 

सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात मोहरीचे तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या गरम तेलात लसूण ठेचून घालावा. सोबतच हळद देखील घालावी. हे सगळे जिन्नस तेलात व्यवस्थित गरम होऊ द्यावे. मग ३ ते ५ मिनिटे तेल मंद आचेवर गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद करावा. तेल गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे तेल थोडे कोमट असतानाच सूज आलेल्या भागांवर हलकेच लावून मसाज करून घ्यावा. त्यानंतर अंगावर ऊबदार असे कपडे घालावेत. या साध्यासोप्या घरगुती उपायामुळे थंडीच्या दिवसांत हातापायांना येणारी सूज कमी होऊन आराम मिळतो.

हा घरगुती उपाय करण्याचे फायदे…

१) मोहरीचे तेल: मोहरीचे तेल हे निसर्गता उष्ण गुणधर्माचे असते, त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील ऊब टिकवून ठेवण्यास मदत होते. या तेलाने मालिश केल्यामुळे संथ झालेला रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. हे तेल स्नायूंमधील कडकपणा कमी करून सांधेदुखी आणि वेदनांपासून त्वरित आराम देते.

२) लसूण पाकळ्या: तेलात लसूण गरम करून लावल्यामुळे तेलाचे औषधी गुणधर्म दुपटीने वाढतात; लसूण हा ‘नॅचरल पेनकिलर’ म्हणून काम करतो. लसणामध्ये दाहशामक गुणधर्म असतात, जे हातापायांवरील सूज झपाट्याने कमी करण्यास मदत करतात. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुधारण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर ठरतो.

३) हळद: हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ हा घटक असतो, जो अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक म्हणून कार्य करतो. हळदीच्या उष्णतेमुळे रक्तातील गाठी किंवा सूज कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा आणि खाज कमी करण्यासाठी हळद फायदेशीर असून ती नैसर्गिकरीत्या जखमा भरून काढण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

31 मिनिटे ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

42 मिनिटे ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

51 मिनिटे ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

55 मिनिटे ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

1 तास ago

महाराष्ट्रात प्रथमच PLFS आणि ASUSE सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक…

1 तास ago