शिलाँग: मेघालयातील ताशखाई परिसरात असलेल्या एका कोळसा खाणीत भीषण स्फोट होऊन किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, मेघालय पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खाणीत अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव व शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ताशखाई येथील कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की अनेक कामगार खाणीच्या आतच अडकले आणि त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. मृत कामगारांपैकी बहुतेक जण आसाम राज्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एक कामगार हा आसामच्या कटिगरा भागातील बिहारा गावातील असल्याचे समोर आले आहे. मात्र, मृतांची अधिकृत ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बचावकार्य सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासनाने घटनास्थळाचा परिसर सील केला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात खाणीतील गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
या दुर्घटनेनंतर कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच बेकायदेशीर खाणकामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…