पपई: सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा.
कलिंगड: दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला भरपूर इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, लाइकोपीन आणि फ्रक्टोज मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. कलिंगड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. यामुळे कलिंगड सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या.
भिजवलेले बदाम: सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. व्यायाम किंवा जिम करणारे लोक जास्त करून भिजवलेले बदाम खातात. मात्र, सर्वांनीच सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेल्या बदामाचा समावेश करायला हवा. बदाम, अक्रोड आणि अंजीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. हे शरीराला ऊर्जावान ठेवण्याचे काम करते.
जिऱ्याचे पाणी: रिकाम्या पोटी जिरे पाणी आणि ओवा पाणी यांसारखा पाचक पेय घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात खनिजे, एंजाइम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. हे चयापचय सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
भाज्यांचे रस: तुम्ही गाजर, बीट आणि हिरव्या भाज्यांपासून बनवलेला रस सकाळी पिऊ शकता. विशेष म्हणजे हिरव्या भाज्यांचा ज्यूस सकाळी नाश्त्यामध्ये पिणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरने मोठ्या प्रमाणात आढळते. हे ज्यूस पचनसंस्था, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…