आरोग्य

अपचन/अजीर्ण/ढेकर कारणे लक्षण आणि त्यावरील उपाय

कारणे

कमजोर पचनशक्ती, जडान्न घेणे. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, तेलकट / तुपट पदार्थ वारंवार खाणे. व्यायाम न करणे, मांसाहार करणे.

लक्षणे

घश्याजवळ जळजळ होणे, अन्न अडकल्यासारखे वाटणे, पोट गच्च राहणे, गॅस होणे, जास्त तहान लागणे, वारंवार ढेकर येणे, भूक मंदावणे. इ.

उपाय

१) उपवास करा, कमी खा आणि हालका आहार घ्या.

२) पचन न होणारा पदार्थ टाळा.

३) वारंवार चहासारखे गरम किंवा कोमट पाणी प्या.

४) पपई/पेरू/आवळा रस घ्या. किंवा आवळा पदार्थ खा.

५) लिंबू रस १ चमचा + खाण्याचा सोडा एक चिमटी (थोडे) मिश्रण गरम करून थंड झाल्यावर लगेच घ्या.

६) लिंबू सरबत १ ग्लास + अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून घ्या.

७) सुंठपावडर एक चमचा + एक चमचा गुळ + थोडे तुप मिश्रण जेवणापूर्वी घ्या.

८) जेवणात कांद्यावर लिंबू पिळून खा.

९) जेवणापूर्वी थोडे आले + गुळ खा. चांगली भूक लागेल.

१०) 5/6 काळ्या मनुका खाणे. आम्लपित्त कमी होते. उत्तम उपाय आहे.

११) रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घ्या. किंवा दूध + तुप घेणे पोट साफ राहील.

१२) नियमित प्राणायाम, योगासने, व्यायाम करा. कायमस्वरूपीच आजार निघून जाईल.

१३) बडीशेप + जिरे + ओवा हे सर्व भाजके + खडीसाखर समप्रमाणात घेणे. थोडे बारीक करून बरणीत भरून ठेवणे. जेवणानंतर १/२ चमचा चावून खाणे. पोटाचे विकार लवकरच कमी होतात.

१४) शिजवलेले अन्न कमी करून कच्चे अन्न खाणे. (गाजर, बिट, काकडी, टोमॅटो, कोबी, कांदा, मटार शेंगा, कोथिंबीर इ.) फायबरयुक्त आहार घेणे. बेकरी प्रोडक्ट टाळा.

१५) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

10 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

15 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

15 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

15 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

15 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

17 तास ago