१) गरम पाण्याचा वापर
पोटदुखी असल्यास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पचन सुधारते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून २-३ वेळा थोडे-थोडे गरम पाणी प्यावे.
2) साजूक तुपाचा वापर
जेवणामध्ये थोडेसे साजूक तूप घालून खाल्याने पचन सुधारते. तुपामुळे आतड्यांना गुळगुळीतपणा येतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते.
3) हिंगाचा वापर
हिंग पाण्यात मिसळून त्याचा लेप पोटावर लावावा किंवा अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात टाकून प्यावे. यामुळे गॅस कमी होतो आणि पोट दुखणे थांबते.
4) आले-गवती चहा
आले आणि गवती चहा पोटदुखीवर खूप प्रभावी आहे. १ कप पाण्यात किसलेले आले आणि गवती चहा घालून उकळावे आणि गाळून प्यावे. यामुळे पचन सुधारते आणि दुखणे कमी होते.
5) लिंबू आणि मधाचे सेवन
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यावे. यामुळे अॅसिडिटी कमी होते आणि पोट हलके वाटते.
6) जिरे-पाणी
१ चमचा जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यावे. जिरे पचन क्रिया सुधारते आणि पोटातील वेदना कमी करतो.
7) तुळशीची पान
तुळशीची काही पाने चावून खावी किंवा तिचा काढा करून प्यावा. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे पोटातील संसर्ग कमी करतात.
8) मेथीचे दाणे
रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी ते खाल्ले तर पचन सुधारते.
9) पुदिन्याचा रस
पुदिन्याचा रस घेतल्याने गॅस कमी होतो आणि पोट हलके वाटते. पुदिना पचनासाठी फार उपयुक्त आहे.
10) साधी आहारशैली अवलंबावी
पोटदुखीच्या वेळी तळलेले, मसालेदार आणि जड अन्न टाळावे. सोपे, हलके आणि शिजवलेले अन्न खावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…