आरोग्य

पोटात दुखत असेल तर अनेक घरगुती उपाय

१) गरम पाण्याचा वापर

पोटदुखी असल्यास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पचन सुधारते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून २-३ वेळा थोडे-थोडे गरम पाणी प्यावे.

2) साजूक तुपाचा वापर

जेवणामध्ये थोडेसे साजूक तूप घालून खाल्याने पचन सुधारते. तुपामुळे आतड्यांना गुळगुळीतपणा येतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते.

3) हिंगाचा वापर

हिंग पाण्यात मिसळून त्याचा लेप पोटावर लावावा किंवा अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात टाकून प्यावे. यामुळे गॅस कमी होतो आणि पोट दुखणे थांबते.

4) आले-गवती चहा

आले आणि गवती चहा पोटदुखीवर खूप प्रभावी आहे. १ कप पाण्यात किसलेले आले आणि गवती चहा घालून उकळावे आणि गाळून प्यावे. यामुळे पचन सुधारते आणि दुखणे कमी होते.

5) लिंबू आणि मधाचे सेवन

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यावे. यामुळे अॅसिडिटी कमी होते आणि पोट हलके वाटते.

6) जिरे-पाणी

१ चमचा जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यावे. जिरे पचन क्रिया सुधारते आणि पोटातील वेदना कमी करतो.

7) तुळशीची पान

तुळशीची काही पाने चावून खावी किंवा तिचा काढा करून प्यावा. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे पोटातील संसर्ग कमी करतात.

8) मेथीचे दाणे 

रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी ते खाल्ले तर पचन सुधारते.

9) पुदिन्याचा रस

पुदिन्याचा रस घेतल्याने गॅस कमी होतो आणि पोट हलके वाटते. पुदिना पचनासाठी फार उपयुक्त आहे.

10) साधी आहारशैली अवलंबावी

पोटदुखीच्या वेळी तळलेले, मसालेदार आणि जड अन्न टाळावे. सोपे, हलके आणि शिजवलेले अन्न खावे.

(सोशल मीडियावरून साभार)

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

11 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

16 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

16 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

16 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

16 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

18 तास ago