CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित आणि वजनाशी संबंधित बऱ्याचदा समस्या जर तुमच्या आहारात फायबर प्रमाण योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे त्यासाठी खालील काही सोप्या पद्धती आहेत.
सफरचंदाचा ज्यूस..
सफरचंद खाणं आरोग्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढाच याचा ज्यूसही फायदेशीर असतो. सफरचंदाचा ज्यूस सेवन केल्याने पोट साफ राहतं. पोटातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक गोष्टी विष्ठेच्या माध्यमातून बाहेर पडतात.
भाज्यांचा ज्यूस…
भाज्यांचा ज्यूसही आतड्यांसाठी फार फायदेशीर असतो. आतड्या साफ करण्यासाठी पालक, टोमॅटो, गाजर, फूलकोबी, ब्रोकली, भोपळा आणि कारल्याच्या ज्यूसचं सेवन करावं. या भाज्यांच्या ज्यूसने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आतड्या नेहमीच साफ राहतात. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.
लिंबू पाणी..
लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याने अॅसिडीटी दूर होऊ पचन तंत्रही मजबूत होतं. या ज्यूसबाबत असं सांगितलं जातं की, याने पोटातील नुकसानकारक बॅक्टेरिया मारले जातात आणि आतड्या चांगल्या साफ होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…