CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित आणि वजनाशी संबंधित बऱ्याचदा समस्या जर तुमच्या आहारात फायबर प्रमाण योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे त्यासाठी खालील काही सोप्या पद्धती आहेत.
सफरचंदाचा ज्यूस..
सफरचंद खाणं आरोग्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढाच याचा ज्यूसही फायदेशीर असतो. सफरचंदाचा ज्यूस सेवन केल्याने पोट साफ राहतं. पोटातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक गोष्टी विष्ठेच्या माध्यमातून बाहेर पडतात.
भाज्यांचा ज्यूस…
भाज्यांचा ज्यूसही आतड्यांसाठी फार फायदेशीर असतो. आतड्या साफ करण्यासाठी पालक, टोमॅटो, गाजर, फूलकोबी, ब्रोकली, भोपळा आणि कारल्याच्या ज्यूसचं सेवन करावं. या भाज्यांच्या ज्यूसने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आतड्या नेहमीच साफ राहतात. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.
लिंबू पाणी..
लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याने अॅसिडीटी दूर होऊ पचन तंत्रही मजबूत होतं. या ज्यूसबाबत असं सांगितलं जातं की, याने पोटातील नुकसानकारक बॅक्टेरिया मारले जातात आणि आतड्या चांगल्या साफ होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…