आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते.
सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात.
लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात.
ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.
शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते.
लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते.
ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे ,पोटात वायू होणे ,ढेकर येणे अशी लक्षणे असतात त्यांच्यासाठी लिंबाचा रस हा अतिशय उत्तम आहे.
लिबाच्या रसामुळे पचनास मदत होते. कारण लिंबाच्या रसामुळे शरीराच्या पतनसंस्थेतील विषद्रव्ये ही बाहेर पडली जातात व पचन हे सुलभ होते.
वजन कमी होण्यासाठी लिंबू पाणी कसे कारणीभूत आहेत ते जाणून घेऊयात.
लिंबा मध्ये आणि इतर फळांमध्ये पेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असतो त्यामुळे पोट भरल्याची भावना जाणवते.
एक पेलाभर लिंबू पाणी प्यायल्यास जेवण कमी जाईल व त्यामुळे काही प्रमाणात उष्मांक कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
लिंबू हे आम्ल प्रकृतीचे असते त्यामुळे लिंबाचं नुसता रस न खाता तो पाण्यातून घेणे अधिक हितावह.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…