आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते.
सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात.
लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात.
ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.
शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते.
लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते.
ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे ,पोटात वायू होणे ,ढेकर येणे अशी लक्षणे असतात त्यांच्यासाठी लिंबाचा रस हा अतिशय उत्तम आहे.
लिबाच्या रसामुळे पचनास मदत होते. कारण लिंबाच्या रसामुळे शरीराच्या पतनसंस्थेतील विषद्रव्ये ही बाहेर पडली जातात व पचन हे सुलभ होते.
वजन कमी होण्यासाठी लिंबू पाणी कसे कारणीभूत आहेत ते जाणून घेऊयात.
लिंबा मध्ये आणि इतर फळांमध्ये पेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असतो त्यामुळे पोट भरल्याची भावना जाणवते.
एक पेलाभर लिंबू पाणी प्यायल्यास जेवण कमी जाईल व त्यामुळे काही प्रमाणात उष्मांक कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
लिंबू हे आम्ल प्रकृतीचे असते त्यामुळे लिंबाचं नुसता रस न खाता तो पाण्यातून घेणे अधिक हितावह.
(सोशल मीडियावरुन साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…