आरोग्य

सारखं डोकं दुखतय मग उपाय करण्याआधी जाणून घ्या डोकेदुखीची कारण

डोकं दुखणं हा सामान्य आणि नेहमीचाच त्रास आहे. मायग्रेनमुळे डोकं दुखतं. मात्र फक्त तेवढंच नाही, अनेकदा यामागे इतरही कारणे असतात.

काही वेळा डोकं दुखणं हे आपल्या शरीराचा थकवा, मानसिक ताण किंवा चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये, कारण त्यामागे काही गंभीर कारणेदेखील असू शकतात.

डोकेदुखीचं एक प्रमुख कारण म्हणजे पित्त. जास्त तिखट, आंबट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पित्त असंतुलित होतं आणि त्याचा परिणाम डोक्यावर होतो. कपाळाच्या भागात किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना जाणवतात. असे सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या. अनेकांना ताणतणाव, चिंता आणि कामाचा भार यामुळेही डोकं दुखतं. सतत विचारात राहणं, झोप न लागणं किंवा कसलाही अति तण घेतल्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात असंतुलन निर्माण होतं आणि डोकं ठणकतं. याशिवाय उपाशी राहणं, अयोग्य वेळेला जेवणं किंवा पाणी कमी पिणं हेही डोकेदुखीला कारणीभूत ठरु शकतं.

झोपेचा अभाव हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण किंवा पुरेशी झोप न घेणे यामुळे शरीर आणि मेंदू थकतात. परिणामी सकाळी उठल्यावर डोकं जड वाटतं आणि दुखणं सुरू होतं. डोळ्यांचा ताणही या समस्येत मोठी भूमिका बजावतो. संगणक, मोबाइल किंवा टीव्हीसमोर बराच वेळ घालवणं, किंवा वाचन करताना कमी प्रकाशात बसणं यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी सुरू होते. काही वेळा महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळेही डोकं दुखतं. मासिक पाळीपूर्वी किंवा दरम्यान होणारे बदल डोक्यावर परिणाम करतात. याशिवाय हवामानातील बदल, धूर, आवाज, आणि प्रदूषण यांचाही परिणाम होऊ शकतो.

सतत आणि तीव्र डोकेदुखी असेल तर तिच्यामागे काही गंभीर कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायनसचा त्रास, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मेंदूत सूज किंवा रक्तप्रवाहात अडथळा यांसारख्या आजारांमुळेही डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःहून औषधं न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

10 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

19 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

19 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

20 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago