ॲनिमियाचा त्रास असेल किंवा शरीरातील लोह कमी झाले असेल तर अशा व्यक्तींना नेहमीच गळून गेल्यासारखे होते. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. अंगातील ताकद कमी झाल्याने नेहमीच खूप अशक्तपणा जाणवतो.
भारतात तर ॲनिमियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत. शिवाय त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातले हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही पदार्थ नक्कीच आपल्याला खूप मदत करू शकतात.
ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पद्धतीने खायला हवे, याविषयीची माहिती आहार तज्ज्ञांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी मदत करणारे पदार्थ
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ आहार तज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काळ्या मनुका हा हिमोग्लोबिन वाढविण्याचा आणि ॲनिमियाचा त्रास कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी ८ ते १० मनुका पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास अगदी महिनाभरातच तुमच्या शरीरातली लोहाची पातळी खूप चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसेल. यासोबतच काळ्या मनुका खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते ते पाहुया..
काळ्या मनुका खाण्याचे फायदे
1) पाण्यात भिजवलेल्या काळ्या मनुका नियमितपणे खाल्ल्यामुळे पचनशक्ती अधिक चांगली होण्यास मदत होते.
2) काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते.
3) काळ्या मनुकांमध्ये असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
4) काळ्या मनुका हा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चा उत्तम स्त्रोत मानला जातो.
5) ज्यांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी काळ्या मनुका नियमितपणे खायला हव्या. कारण त्या पित्तशामक असतात.
(सोशल मीडियावरून साभार)
‘डिलिमिटेशन’च्या आड अडथळे निर्माण केल्याचा आरोप मुंबई: महिला आरक्षण हा कोणावर केलेला उपकार नसून तो…
भोर: भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या…
नसरापूर: येथील राम मंदिर परिसरातून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सायंकाळी संशयास्पद…
मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…
ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…
सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…