आरोग्य

फक्त १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे अनेक फायदे

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच याचे काही तोटेही आहेत.

ब्लड शुगर राहील स्थिर

गहू हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते. जे विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहे. ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी मदत होईल.

पचन सुधारते

गव्हात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांसंबंधीत समस्या किंवा पचनक्रिया मंद होऊ शकते. ज्यामुळे गॅस, पोटदुखी, उलट्या, आणि पोटाचे विकार वाढू शकतात. अशा परिस्थितीत गहू न खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

व्हाईट ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या प्रोसेस्ड कार्ब्सचा वजनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रिफाईंड गव्हापासून तयार पदार्थ वेट गेन करतात. याशिवाय हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूकही लागते. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर, हे पदार्थ खाणं बंद करा. ज्यामुळे कॅलरीज इनटेक कमी होईल आणि वेट लॉस होईल.

गव्हाला पर्याय काय

आपण क्विनोआ, ओट्स, ब्राऊन तांदूळ किंवा ज्वारी बाजरीचे पदार्थ खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

11 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

15 मिनिटे ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

20 मिनिटे ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

24 मिनिटे ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

11 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

11 तास ago