आरोग्य

फक्त १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे अनेक फायदे

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच याचे काही तोटेही आहेत.

ब्लड शुगर राहील स्थिर

गहू हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते. जे विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहे. ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी मदत होईल.

पचन सुधारते

गव्हात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांसंबंधीत समस्या किंवा पचनक्रिया मंद होऊ शकते. ज्यामुळे गॅस, पोटदुखी, उलट्या, आणि पोटाचे विकार वाढू शकतात. अशा परिस्थितीत गहू न खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

व्हाईट ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या प्रोसेस्ड कार्ब्सचा वजनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रिफाईंड गव्हापासून तयार पदार्थ वेट गेन करतात. याशिवाय हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूकही लागते. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर, हे पदार्थ खाणं बंद करा. ज्यामुळे कॅलरीज इनटेक कमी होईल आणि वेट लॉस होईल.

गव्हाला पर्याय काय

आपण क्विनोआ, ओट्स, ब्राऊन तांदूळ किंवा ज्वारी बाजरीचे पदार्थ खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

7 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

16 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

16 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

17 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

22 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

22 तास ago