हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो.
पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा.
मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
फिजिकली अॅक्टिव्ह रहा: नियमित चालणे हा व्यायाम केलात तरी अनेक आजारांपा- सून दूर राहू शकता.थोडक्यात फिजिकली अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
वजन घटवणे: वाढणारे वजन उच्च रक्तदाबाच्या रूग्णां साठी त्रासदायक बाब आहे.त्या मुळे वेळीच आहार,व्यायामात बदल करून अतिरिक्त चरबी घटवा.
हे घटक कमी करा: अशांनी आहारातील खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणे टाळा.तसेच आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवावा.
मद्यसेवनावर नियंत्रण: उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्या नंतर/आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे हे करणे टाळा.
ताण-तणाव कमी करा: मानसिक धक्का बसेल/ तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. आवडत्या छंदामध्ये,योगाभ्यासामध्ये मन रमवा.
(सोशल मीडियावरून साभार)
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…