आरोग्य

पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक…

पपई हे फळ मुळातच आरोग्यवर्धक आहे. पपई खाण्याचे फायदे आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच उपयुक्त असतात. पपई म्हटलं की मऊसूत, गोडसर चवीची रसरशीत पपई आपल्याला आठवते. पपई हे फळं फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. खरंतर, पपई त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदानच ठरते. पपईत असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते, डाग कमी होतात, डेड स्किन निघून जाते आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज येते.

त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु या महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सऐवजी, पपईच्या सालींपासून – पानांपर्यंत, बियांपासून – गरापर्यंत पपईचा प्रत्येक भाग हा त्वचेवर एखाद्या जादू प्रमाणेच काम करतो. आतापर्यंत आपण पपईच्या गराचा वापर फेसमास्क, स्क्रब, फेसवॉश, फेसपॅकमध्ये केलेला पाहिला असेल, परंतु पपईच्या झाडाची पाने देखील त्वचेसाठी उत्तम मानली जातात.

पपईच्या पानांचा फेसमास्क कसा तयार करायचा

पपईच्या पानांचा फेसमास्क तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ पपईची ताजी पान, प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि बेसन आणि थोडे पाणी इतक्या तीन पदार्थांची गरज लागणार आहे.

पपईच्या पानांचा फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी, पपईच्या झाडांची ताजी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. या पानांचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये घालावेत. मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून ही पेस्ट वाटून घ्यावीत. मिक्सरमधील तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी, त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि बेसन घालून सगळे जिन्नस एकत्रित कालवून घ्यावेत. त्वचेवर लावण्यासाठी पपईच्या पानांचा फेसमास्क तयार आहे.

पपईच्या पानांचा फेसमास्क कसा वापरायचा 

पपईच्या पानांपासून तयार केलेला फेसमास्क चेहरा आणि मान यावर चांगल्या प्रकारे लावावा. मास्क लावल्यानंतर तो २० ते २५ मिनिटे तसेच ठेवावा. नंतर हलक्या हातांनी मसाज करत करत तो मास्क चेहऱ्यावरून काढावा. शेवटी पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुवून टाका. हा मास्क तुम्ही आठवड्यातून ३ वेळा लावू शकता. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ, मऊसूत आणि चमकदार दिसू लागेल.

पपईच्या पानांचा फेसमास्क वापरण्याचे फायदे… 

१) पपईच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ ठेवून मुरुमांचा त्रास कमी करतात.

२) पानांमध्ये असणारे एन्झाईम्स त्वचेवरील डेड स्किन हटवतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतात.

३) चेहऱ्यावरील काळे डाग, टॅन काढून त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होते.

४) यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता वाढवतात, ज्यामुळे वयोमानानुसार त्वचेवर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

५)पपईची पाने थंडावा देणारी असल्यामुळे त्वचेवरील लालसरपणा किंवा सूज कमी करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

13 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

13 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago