आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, व्हिटामिन कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्ता मध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे, तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह.
पुढील काही विनाखर्चाचे घरगुती उपचार आहेत, जे रोजच्या आहारातील आहेत, जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास, अनेक रोगांपासुन स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो.
दररोज किमान ३ खजुर खाणे.
महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे.
आठवड्यातुन किमान एका वेळेस जेवणानंतर पान खावे.
दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे.
सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे, त्यानंतर १ तासाने कोमट पाणी घ्यावे.
टॅामेटो गाजर बीट इत्यादी सॅलड दररोज दुपारी किमान एका वेळेस तरी घ्यावे.
शिर्षासन ५ मिनिट व पायांच्या टाचेवर ५ मिनिट उभे राहावे.
महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे व वमन करावे.
महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, सलाड व पाणी चालेल.
महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळी मिरी ची पावडर व काळे मीठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे.
पहाटे लवकर उठून १० मिनिट प्राणायाम करावा.
ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्या सोबत घ्यावे.
स्त्रियांनी मासिक पाळी नंतर व त्या आधीच्या त्रासासाठी, दररोज दुपारी जेवणा नंतर अर्धा ग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी तर होतेच, शिवाय शरिरातील विषतत्वे नाहिशी होतात.
दररोज कमीत कमी २० मिनिट चालावे.
कडधान्ये, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच, शिवाय अशक्तपणा हि जातो.
आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०-२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. असे दररोज केल्यास उत्तमच.
कोणत्याही आहारा मध्ये थोडीशी सुंठ वापरावी.
वरील पैकी कोणतेही उपाय जे सहज शक्य असतील ते करून स्वतःला व परिवाराला निरोगी करूया.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…