आरोग्य

वाचा चॉकलेट खाण्याचे ३ जबरदस्त फायदे, करा तोंड गोड

लहान मुलं घरात असली की त्यांचा सतत चॉकलेट खाण्याचा हट्ट असतो आणि पालक त्यांना चॉकलेट खाऊ नको म्हणून रागवत असतात. पालकांचं काहीही चुकीचं नाही. पण चॉकलेट खाण्याचे हे काही फायदे जर तुम्ही वाचले तर लहान मुलांचं तर सोडाच पण तुम्ही स्वतःच रोज एक तुकडा तरी चॉकलेटचा नक्कीच खाल. जर योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्लं तर ते आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरू शकतं असं सांगणारे अनेक अभ्यास आजपर्यंत तज्ज्ञ मंडळींनी केलेले आहेत.

चॉकलेट खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे 

१) चॉकलेट खाणं कसं आरोग्यदायी ठरू शकतं याविषयी डॉ. पियुष मिश्रा यांनी दिलेली माहिती नवभारत टाइम्सने प्रकाशित केली आहे. त्यानुसार डॉक्टर असं सांगत आहे की जर तुम्ही दररोज डार्क चॉकलेटचा एक लहानसा तुकडा खाल्ला तर त्यातून तुम्हाला जवळपास ६४ एमजी एवढ्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळू शकत. चांगली शांत झोप येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांनी दररोज रात्री झोपण्याच्या आधी डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा खावा.

२) डार्क चॉकलेटमध्ये बऱ्याच प्रमाणात ॲन्टीऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे शरीर आणि मेंदू दोघांसाठीही डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं.

३) डार्क चॉकलेटमध्ये असणारे काही घटक रोगप्रतिपारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात, असंही काही अभ्यासावरून समोर आलेलं आहे. त्यामुळे दररोज डार्क चाॅकलेट खायला हरकत नाही. पण त्याचं प्रमाण किती असावं ते पाहा..

दररोज किती प्रमाणात चॉकलेट खाव

चॉकलेट खाण्याचे फायदे या संदर्भात जे काही अभ्यास झालेले आहेत त्यानुसार दिवसातून २० ते ३० ग्रॅम म्हणजेच एक किंवा दोन छोटे तुकडे एवढ्याच प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर आहे.

जर तुम्ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात खात असाल तर मात्र शरीरातील साखरेचे आणि कॅफिनचे प्रमाण वाढू शकते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डार्क चॉकलेट खरेदी कराल तेव्हा त्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त कोको पावडर असेल याकडे लक्ष द्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

3 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

3 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

20 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

20 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

20 तास ago