आरोग्य

शेवगा हे निसर्गाचं अमूल्य देण

आपण नेहमी आरोग्यासाठी महागड्या सप्लिमेंट्स, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटीन शेक्स शोधतो. पण निसर्गानेच आपल्याला एक अशी चमत्कारीक भाजी दिली आहे, जी शरीरासाठी सुपरफूडच ठरते, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा, म्हणजेच मोरिंगा.

शेवगा – एक मल्टीव्हिटॅमिन: शेवग्यात आहे दुधापेक्षा ४ पट अधिक कॅल्शियम, म्हणजेच हाडांसाठी अजोड. केळ्यांपेक्षा ३ पट जास्त पोटॅशियम, म्हणजे हृदय आणि स्नायूंच्या कार्यासाठी उत्तम. आणि मांसाहार पेक्षा २ पट अधिक प्रथिने, म्हणजे शरीराची ताकद वाढवणारा नैसर्गिक स्त्रोत.

ताकद नि रोगप्रतिकारक शक्ती वाढते: शेवग्यात अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, फॉस्फरस, आणि अ, क व ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो आणि त्वचा चमकदार राहते.

सगळ्यांसाठी उपयुक्त: शेवग्याची पाने, शेंगा, फुले सगळेच उपयोगी आहेत. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनी शेवग्याचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः महिलांसाठी तर हे एक नैसर्गिक शक्तिवर्धक आहे.

निसर्गाचं अमूल्य देण: जर आपण दररोजच्या आहारात थोडा जरी शेवगा घेतला, तरीही त्याचे फायदे वर्षानुवर्षे टिकून राहतात. म्हणूनच म्हणतात, गोळ्यांमध्ये नाही, आरोग्य असतं ते आपल्या पारंपरिक भाज्यात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

3 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

4 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

8 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

8 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

8 तास ago