संतुलित जीवनशैली ही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आहार विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचे उत्तमरित्या नियोजन करता आले, तर आरोग्य नकळतच चांगले राहते. पण यामध्ये सुसूत्रता नसेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. शारीरिक आरोग्या सोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणेही अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी रुटीन मध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा.
सूर्यप्रकाश आपल्याला मोफत मिळत असलेली एक उत्तम देणगी आहे. पण आपण तिचा म्हणावा तसा उपयोग करुन घेत नाही. मात्र सूर्यप्रकाश शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून नियमितपणे सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सूर्यप्रकाशात शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन-डी असते. मानसिक आरोग्यासाठीही सूर्यप्रकाश अतिशय उपयुक्त असतो. शरीरात सेराटोनिन या हार्मोनची निर्मिती होण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर असतो. हा हार्मोन आनंदाशी निगडीत असल्याने त्याला हॅपी हार्मोन म्हटले जाते. म्हणूनच मूड चांगला राहावा आणि आपण कायम जास्तीत जास्त आनंदी राहावे यासाठी उन्हात बसण्याचा फायदा होतो.
कोणत्या गोष्टीमुळे नैराश्य आले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही हा हार्मोन अतिशय फायदेशीर ठरतो. म्हणून सकाळी सूर्य उगवण्याच्या २ तास आधी म्हणजेच जेव्हा खूप प्रखर सूर्यप्रकाश नसेल तेव्हा, साधारण २० मिनीटे अंगावर सूर्यप्रकाश आवर्जून घ्यायला हवा. अगदी ५ मिनीटा पासून सुरुवात केली तरी दिवसभर वाटणारा फ्रेशनेस, आनंद यातील बदल नक्कीच लक्षात येईल. यामुळे नकळतच मूड चांगला राहण्यास मदत होईल, झोपेची गुणवत्ताही सुधारेल. एकूण क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची पद्धत सगळेच सुधारण्यास ऊन्हात बसण्यामुळे मदत होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…