उलट्या किंवा अंगावर लाल चट्टे निर्माण होत अंगाला खाज सुटत असेल तर त्यासाठी आमसुलाचे सार पिणे व कोळलेल्या आमसुलांचा चोथा अंगाला चोळून १५ मिनिटांनी स्नान करणे . उलटी झाल्यास आले(१ छोटा तुकडा बारीक ठेचलेला) अर्धे लिंबू(रस), थोडेसे मीठ व अर्धा चहाचा चमचा मध यांचे एकत्र सेवन केल्यास उपयोग होतो.
पित्त होण्याची कारणे
जास्त तिखट आणि तेलकट खाणे,पुरेशी झोप न होणे,खाण्याच्या आणि झोपण्याचा वेळा बदलणे,बाहेरील खाद्यपदार्थ खाणे,इत्यादी पित्त होण्याची कारणे आहेत.
उपाय
जास्त तेलकट आणि तिखट खाणे टाळा. जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्याच पालन करा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्य तितके टाळा. कोकम सरबत किंवा आमसूल चा आहारात वापर करत राहा. अंगावर पित्त उठत असेल तर घरातील आमसूल पित्त उठत असलेल्या जागेवर चोळा,जास्त पित्त खवळले तर कोकम सरबत किंवा आमसूल चे पाणी करून प्या
कारण पित्त हे शरीरात तयार होणे गरजेचे च असते,फक्त त्याचे प्रमाण संतुलित राहिले पाहिजे.पित्त कमी तयार होत असेल किंवा जास्त प्रमाणात तयार होत असतील तर ते आरोग्याला चांगले नसते. पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा. सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते. खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो. नेहमी पित्ताचा त्रास होण्यार्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या. रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
नियमित तुळशीचे सेवन पित्त मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे. जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात. आमसूल यालाच कोकम किंवा रतांबा असेही म्हणतात. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…