आरोग्य

महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. काही जणींचे केस अजिबातच वाढत नाहीत तर काही जणींचे केस खूप जास्त गळतात. कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढलेले आहे. केसांच्या अशा काही तक्रारी सुरू झाल्या की आपण मग बाजारात विकत मिळणारे महागडे तेल किंवा केसांसाठीचे इतर काही कॉस्मेटिक्स वापरायला सुरुवात करतो. पण त्याने फरक पडेलच असं नाही. म्हणूनच आता हा एक स्वस्तात मस्त आणि केसांसाठी अतिशय गुणकारी ठरणारा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळे आणि इतर काही साहित्य लागणार आहे.

घरच्याघरी आवळ्याचं तेल तयार करण्याची पद्धत

केसांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच केस दाट, काळे होण्यासाठी घरच्याघरी आवळ्याचं तेल कसं तयार करायच. या पद्धतीने तेल तयार करण्यासाठी आपल्याला ४ आवळे लागणार आहे. सगळ्यात आधी आवळे व्यवस्थित किसून घ्या. त्यानंतर आवळ्याचा किस एका कढईमध्ये घाला. त्यामध्ये अर्धा कप मोहरीचं तेल, १ चमच्या मेथ्या, १ चमचा कलौंजी आणि कडिपत्त्याची मुठभर पाने घाला. हे सगळे पदार्थ सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.

सगळे पदार्थ व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारण २ ते अडीच कप खोबरेल तेल घाला आणि पुन्हा एकदा तेलाला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि १० ते १२ तास हे मिश्रण तसंच ठेवा. त्यानंतर सगळे पदार्थ गाळून घ्या आणि तेल एका बरणीमध्ये भरून ठेवा. हे तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना लावून चांगली मालिश करा. अगदी २-३ आठवड्यांतच केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन केसांची चांगली वाढ झाल्याचं जाणवेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago