थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
पांढऱ्या तिळाला नियमितपणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हृदयविकार आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या तिळात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन कमी होते. यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. हिवाळ्यात आपल्याला गुडघेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो. अशावेळी हाडं मजबूत करण्यासाठी नियमित रुपात तीळ खायला हवे. पांढऱ्या तीळात असणारे पोषक तत्व शरीरातील कॅल्शियम वाढवते. त्यासाठी रोज चमचाभर तीळ खायला हवे.
तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आहे. जे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत करतात. सांधिवात, हाडांच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी तर आवर्जून तीळ खा. तसेच पांढरे तीळ हे सूपरफुड मानले जाते. मुठभर तीळ खाल्ल्याने आळस, कमकुवतपणा आणि थकवा दूर होतो. थंडीच्या दिवसात तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करतात. हाडांसोबतच केस, सेल्स मेंब्रेन आणि मेंदू चांगला राहातो. जर तुम्हालाही नुसते तीळ खायला आवडत नसतील तर या पद्धतीने ट्राय करुन पाहा.
पांढऱ्या तीळाचा रोल
पांढऱ्या तीळाचा रोल बनवण्यासाठी सर्वात आधी २५० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, १५ ते २० अंजीर, ५० ग्रॅम खरबूजाच्या बिया, ५० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, २५ ग्रॅम पांढरे तीळ घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजीर बारीक चिरून तुपात भाजून घ्या. तसेच सूर्यफुलाच्या बिया, खरबूजाच्या बिया आणि पांढरे तीळ भाजून घ्या. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक करा. पॅनमध्ये तुप घालून गरम करा, त्यात गूळ घालून त्याचे पाक तयार करा. गूळ वितळला की, त्यात भाजलेला सुका मेवा आणि पांढरे तीळ घालून मिश्रण चांगले मिसळा. तयार मिश्रण कणकेसारखे मळून त्याचा पातळ रोल बनवा. त्याचे बारीक तुकडे करा किंवा लाडूसारखे वळवू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…