थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
पांढऱ्या तिळाला नियमितपणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हृदयविकार आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या तिळात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन कमी होते. यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. हिवाळ्यात आपल्याला गुडघेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो. अशावेळी हाडं मजबूत करण्यासाठी नियमित रुपात तीळ खायला हवे. पांढऱ्या तीळात असणारे पोषक तत्व शरीरातील कॅल्शियम वाढवते. त्यासाठी रोज चमचाभर तीळ खायला हवे.
तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आहे. जे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत करतात. सांधिवात, हाडांच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी तर आवर्जून तीळ खा. तसेच पांढरे तीळ हे सूपरफुड मानले जाते. मुठभर तीळ खाल्ल्याने आळस, कमकुवतपणा आणि थकवा दूर होतो. थंडीच्या दिवसात तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करतात. हाडांसोबतच केस, सेल्स मेंब्रेन आणि मेंदू चांगला राहातो. जर तुम्हालाही नुसते तीळ खायला आवडत नसतील तर या पद्धतीने ट्राय करुन पाहा.
पांढऱ्या तीळाचा रोल
पांढऱ्या तीळाचा रोल बनवण्यासाठी सर्वात आधी २५० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, १५ ते २० अंजीर, ५० ग्रॅम खरबूजाच्या बिया, ५० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, २५ ग्रॅम पांढरे तीळ घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजीर बारीक चिरून तुपात भाजून घ्या. तसेच सूर्यफुलाच्या बिया, खरबूजाच्या बिया आणि पांढरे तीळ भाजून घ्या. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक करा. पॅनमध्ये तुप घालून गरम करा, त्यात गूळ घालून त्याचे पाक तयार करा. गूळ वितळला की, त्यात भाजलेला सुका मेवा आणि पांढरे तीळ घालून मिश्रण चांगले मिसळा. तयार मिश्रण कणकेसारखे मळून त्याचा पातळ रोल बनवा. त्याचे बारीक तुकडे करा किंवा लाडूसारखे वळवू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…