आरोग्य

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.

शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं

जेव्हा आपण हायड्रेटेड राहतो, म्हणजेच शरीरात योग्य प्रमाणात पाणी असतं, तेव्हा आपली किडनी चांगल्याप्रकारे कार्य करतं. यासोबतच शरीरातून विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. हायड्रेटेड राहिल्याने एनर्जी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसारख्या समस्या कमी होतात, शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला डिटॉक्स करतं.

थ्री ड्रिंक थिअरी काय आहे?

आपल्या शरीराचा ५०-७०% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरातील लहान घटकांना म्हणजेच पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा पाण्याचे सेवन कमी होते तेव्हा या पेशी कमकुवत होतात आणि शरीर थकू लागतं, म्हणून दिवसभर पाणी पित राहणं खूप महत्त्वाचं आहे.’थ्री ड्रिंक थिअरी’ हा स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये दिवसभरात तीन प्रकारचे पेय पिण्याचा सल्ला दिला जातो.

साधं पाणी

दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास साधं पाणी प्या. जर तुम्हाला साधं पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही त्यात लिंबू, बडीशेप, पुदिना, दालचिनी किंवा चिया सी़ड्स घालू शकता. यामुळे चव आणि पोषण दोन्ही मिळेल.

ज्यूस आणि सूप

फळं आणि भाज्यांचा ज्यूस किंवा सूपमधून शरीराला मिनरल्स आणि पाणी दोन्ही मिळतं. जसं नारळ पाणी, कलिंगड, संत्री, पपई, काकडी, टोमॅटो, पालक, गाजर इत्यादी. हे तुम्ही सॅलडमध्ये देखील खाऊ शकतात.

तुमचं आवडीचं पेय

चहा, कॉफी, दूध, लस्सी किंवा ताक यांसारखे पेय देखील शरीरात द्रवपदार्थाचं प्रमाण टिकवून ठेवतात. कॅफिनचे प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे. दिवसातून २-३ कपपेक्षा जास्त चहा कॉफी घेऊ नका. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

8 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

8 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

8 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

8 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

13 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

13 तास ago