आरोग्य

शंकराला प्रेमानं वाहतो ती ५ फुल अत्यंत औषधी-अनेक दुखणीखुपणी होतील दूर…

महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.

महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले अनेक दुखण्याखुपण्यावर रामबाण उपाय आहेत. आयुर्वेदात अशी काही फुले आहे जी धार्मिक कार्यात देखील महत्त्वाची मानली जातात. ज्याचा वापर आपल्या शरीरासाठी बहुगुणी समजला जातो.

चमेलीचे फुल महादेवाला अर्पण केल्याने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच त्वचेसाठी आणि केसासाठी चमेलीचे फुल फायदेशीर आहे. या फुलाचा सुगंध घेतल्याने स्ट्रेस कमी होतो. याचा चहा प्यायल्याने शरीर स्लिम होते.

निळ्या रंगाचे गोकर्ण फूल भगवान शंकराला प्रिय आहे. असे म्हटले जाते हे फूल शिवपिंडीवर चढवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. या फुलामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. शरीरातील कोलेजन वाढवते.

धतुऱ्याचे फूल महादेवाला अर्पण केल्याने दु:खातून आणि त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच या फुलाचा आर्युर्वेदात वापर केला जातो. याच्या पानांचा धूर दमा कमी करण्यास मदत करतो. याच्या पानांचा अर्क कानात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात.

बेलाचे पान शंकराला अतिशय प्रिय आहे. यामध्ये त्रैमूर्तिचा वास असतो असे म्हटले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. बेलाचे पान चावून खाल्ल्याने हृदय मजबूत होते.

शिवपिंडीवर आक फुले अर्पण केले जाते. याचा वापर केल्याने त्वचेवरील डाग, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. तसेच डोकेदुखी, गुडघेदुखी, कान, दात दुखणे यावर रामबाण ठरते. ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

9 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

9 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

9 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

10 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

10 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

10 तास ago