आरोग्य

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

सामान्यपणे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक दोन्ही हात एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे हात गरम होतात. शरीरातही उष्णता जाणवते. याने थंडी कमी लागते. तसेच तुम्ही हेही पाहिलं असेल की, कुणी चक्कर येऊन पडलं किंवा आजारी पडलं तर त्यांचे हात किंवा तळपाय रब केले जातात म्हणजे घासले जातात. तुम्हीही कधीना कधी लोकांना पाहून किंवा घरातील मोठ्यांना पाहून असं केलं असेल. पण याने काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसत.

तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे

ब्लड सर्कुलेशन वाढत: जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही.

डोळ्यांना फायदा: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. असं केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह वाढतो. यासाठी सुरूवातीला तुम्ही हात हळूहळू रब करा आणि हळूहळू स्पीड वाढवा. जेव्हा हात हलके गरम होतील तेव्हा ते डोळ्यांवर लावा. याने डोळ्यांची दृष्टीही वाढेल आणि चमकही वाढेल.

टेन्शन होईल कमी: हात एकमेकांवर घासणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगलं असतं. कारण याने मेंदू शांत होऊ याला आराम मिळतो. हा व्यायाम केल्याने मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. तुम्हाला सकारात्मक वाटतं. सकाळी ही क्रिया केल्याने तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकतं.

हिवाळ्यात फायदेशीर: हिवाळ्यात अनेकदा लोकांचे हात थंडे होतात, ज्यामुळे आराम मिळवण्यासाठी लोक हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे बोटे आखडतात अशात हात एकमेकांवर घासल्याने मसल्स अ‍ॅक्टिव होतात आणि आखडलेपणा कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago