मुख्य बातम्या

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री उशिरा बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी संदीप गुलाब खेडकर (वय ३२) रा. म्हसे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे (दि २२) रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास म्हसे ते पिंप्री कोलंदर रस्त्यावर दुचाकीवरुन जात असताना आरोपी यांनी त्यांची चारचाकी गाडी व बुलेट फिर्यादीच्या दुचाकीला आडवी लाऊन बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन कोयत्याने वार करुन दुखापत केली व फिर्यादीच्या खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढुन घेतली.

 

त्यामुळे संदीप खेडकर यांच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गणेश रामभाऊ दिवेकर, दादा मोहरे, विशाल लक्ष्मण देवीकर, अवी जर्जोळ, विजय भाऊसो देवीकर तसेच एक अनोळखी इसम सर्व (रा. म्हसे, ता. श्रीगोंदा, जि अहिल्यानगर) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती कोळपे हे करत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

6 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

6 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

8 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

8 तास ago