मुख्य बातम्या

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री उशिरा बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी संदीप गुलाब खेडकर (वय ३२) रा. म्हसे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे (दि २२) रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास म्हसे ते पिंप्री कोलंदर रस्त्यावर दुचाकीवरुन जात असताना आरोपी यांनी त्यांची चारचाकी गाडी व बुलेट फिर्यादीच्या दुचाकीला आडवी लाऊन बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन कोयत्याने वार करुन दुखापत केली व फिर्यादीच्या खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढुन घेतली.

 

त्यामुळे संदीप खेडकर यांच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गणेश रामभाऊ दिवेकर, दादा मोहरे, विशाल लक्ष्मण देवीकर, अवी जर्जोळ, विजय भाऊसो देवीकर तसेच एक अनोळखी इसम सर्व (रा. म्हसे, ता. श्रीगोंदा, जि अहिल्यानगर) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती कोळपे हे करत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

21 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

21 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

21 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

21 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

2 दिवस ago