आरोग्य

केस नॅचरली काळे करण्याचा सगळ्यात सोपा उपाय मेहंदी, डाय लावण्याची कटकटच नाही

हल्ली कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले आहेत. कॉलेजमधल्या कित्येक विद्यार्थ्यांचेही केस हल्ली पांढरे झालेले असतात आणि ते लपविण्यासाठी त्यांना डाय, मेहेंदी, हेअरकलर अशा गोष्टींचा वापर करावा लागतो.

एवढ्या कमी वयापासूनच केसांवर केमिकलयुक्त डाय किंवा हेअरकलर लावणे अनेकांना पटत नाही. कारण त्याचे खूप साईडइफेक्ट त्वचेवर, केसांवर, आरोग्यावर होत असतात असं आपण नेहमीच ऐकतो.

म्हणूनच आता मेहेंदी, डाय असं काहीही न लावता केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे करायचे असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी त्रिफळा चूर्ण एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये घ्या.

त्या चुर्णामध्ये लिंबाचा रस घाला. त्रिफळा चूर्ण व्यवस्थित भिजून त्याची चांगली पेस्ट तयार होईल एवढा लिंबाचा रस त्यात घालावा.

आता ही कढई रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या त्रिफळा चूर्णला काळसर रंग आलेला असेल. आता ही पेस्ट हातामध्ये ग्लोव्ह्ज घालून किंवा ब्रश वापरून तुमच्या केसांना लावा.

ही पेस्ट तुमच्या केसांवर साधारण १ तास राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांना छान काळसर रंग आलेला असेल आणि हा रंग तुमच्या केसांवर महिनाभर तरी टिकून राहील असं डॉक्टर सांगत आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

3 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

4 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

8 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

8 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

9 तास ago