आरोग्य

आरोग्यदायी गाजराचा ज्युस

वजन कमी करण्यासाठी अनेक जण गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात. पण असं करत असताना योग्य डाएट घेणं आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होतो. गाजर खावून तुम्ही वजन नियंत्रित करु शकता. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल, तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरात जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.

गाजराच्या ज्यूसचे फायदे

गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे त्वचेवर चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.

गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्यांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे तणाव आणि चिंतामुक्त ठेवण्यास मदत करते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

5 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

5 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

6 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

11 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

11 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

11 तास ago