आरोग्य

आरोग्यदायी गाजराचा ज्युस

वजन कमी करण्यासाठी अनेक जण गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात. पण असं करत असताना योग्य डाएट घेणं आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होतो. गाजर खावून तुम्ही वजन नियंत्रित करु शकता. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल, तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरात जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.

गाजराच्या ज्यूसचे फायदे

गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे त्वचेवर चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.

गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्यांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे तणाव आणि चिंतामुक्त ठेवण्यास मदत करते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

15 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

19 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

19 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

19 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

20 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

22 तास ago