डाळिंब हे बहूगुणकारी आहे. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणका सारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तान कडील फळ आहे. डाळिंबात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात.
चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्याने दुर्गंधी निघून जाते.
शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्या.
श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.
मूळव्याधी मध्ये रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशर मध्ये घालून द्यावे, यामुळे रक्तपडण्याचे बंद होते, तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.
ताप आला असेल तर डाळिंब खावे. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. ज्यांना रक्ताची कमतरता (अॅनिमिया) आहे त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबा पासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ, वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे, कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याच प्रमाणे स्वाद व चवही कमी होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…