जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या मध्येच असते. कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं, १०० वर्ष जगावं.
मात्र आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी फॉलो करून इतकं जगता यावं. तर १०० वर्ष कसं जगता येईल हे एका १०० वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. महिला डॉक्टर ग्लेडिस मॅकगॅरी यांचं वय १०३ वर्ष आहे. या वयातही त्या फार सक्रिय आहेत. त्यांनी ‘द वेल लिव्ड लाइफ : ए 103 ईअर ओल्ड डॉक्टर्स सीक्रेट्स टू हेल्थ अँड हॅपीनेस अॅट एवरी एज’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि यात त्यांनी जास्त आयुष्य जगण्याचं रहस्य सांगितले आहेत. अशात त्यांच्या इतकं जगण्याचं रहस्य काय आहे.
नवीन शिकत रहा: आपल्या पैकी सगळ्यांनी काहीना काही नवीन शिकणे, पुढे जाणे आणि आपल्या क्वालिटी वाढवण्याचं काम केलं पाहिजे. यामुळे तुम्ही सजग राहता.
स्वत:वर प्रेम करा: जगात प्रत्येक दोन पैकी एक व्यक्ती डिप्रेशनचा शिकार आहे. हे लोक स्वत:वर फार कमी प्रेम करतात. त्यामुळे जास्त जीवन जगण्यासाठी आधी तुम्ही स्वत: प्रेम करायला शिका.
एनर्जी वाया घालवू नका: तुमची एनर्जी अशा गोष्टीवर घालवा, जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा आनंद देते. हे काही फार अवघड काम नाही. जेव्हा या पद्धतीने आपण जीवन जगत असतो, तेव्हा खरंच आपण जीवन जगत असतो.
काय खावे: प्लांट बेस्ड डाएट फॉलो केला पाहिजे. म्हणजे झाडांपासून बनलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळं इत्यादींचं सेवन केलं पहिजे. तसेच भरपूर पाणी प्यायला हवं. याने तुमचं आयुष्य वाढू शकतं.
(सोशल मीडियावरून साभार)
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…