आरोग्य

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय

कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना तर खूपच वेदना हाेत लहान मुलांच्या बाबतीत तर हा त्रास जास्त दिसून येतो.

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघू नये म्हणून काय करावे. 

१) यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना हा त्रास हाेतो. शिवाय ऋतू बदलण्याचा जो काळ असतो, त्या काळात हा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांनी ऋतू बदलायच्या सुमारास त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी. नखाच्या आजुबाजुला मॉईश्चरायझर, खोबरेल तेल, बदाम तेल, साजूक तूप लावून ती त्वचा अधिकाधिक हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहिल याची काळजी घ्यावी.

२) शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हे देखील यामागचं एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर तुमच्याही आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ कमी प्रमाणात जात आहेत का हे एकदा तपासून पाहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला सुरुवात करा.

३) नखांची, हाताची योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तर त्यामुळेही जंतूसंसर्ग होऊन हा त्रास होऊ शकतो. किंवा तो कमी प्रमाणात असेल तर वाढू शकतो. त्यामुळे हाताची, नखांची स्वच्छता ठेवा. नखे वेळेवर कापा. नखांमध्ये घाण जमा होऊ देऊ नका, असा सल्लाही डाॅक्टर देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

21 मिनिटे ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

37 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

40 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

51 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

56 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

59 मिनिटे ago