कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना तर खूपच वेदना हाेत लहान मुलांच्या बाबतीत तर हा त्रास जास्त दिसून येतो.
नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघू नये म्हणून काय करावे.
१) यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना हा त्रास हाेतो. शिवाय ऋतू बदलण्याचा जो काळ असतो, त्या काळात हा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांनी ऋतू बदलायच्या सुमारास त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी. नखाच्या आजुबाजुला मॉईश्चरायझर, खोबरेल तेल, बदाम तेल, साजूक तूप लावून ती त्वचा अधिकाधिक हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहिल याची काळजी घ्यावी.
२) शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हे देखील यामागचं एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर तुमच्याही आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ कमी प्रमाणात जात आहेत का हे एकदा तपासून पाहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला सुरुवात करा.
३) नखांची, हाताची योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तर त्यामुळेही जंतूसंसर्ग होऊन हा त्रास होऊ शकतो. किंवा तो कमी प्रमाणात असेल तर वाढू शकतो. त्यामुळे हाताची, नखांची स्वच्छता ठेवा. नखे वेळेवर कापा. नखांमध्ये घाण जमा होऊ देऊ नका, असा सल्लाही डाॅक्टर देतात.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…