आरोग्य

रात्रीच्या जेवणात हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नयेत

सकाळचा नाश्ता एखाद्या राजाप्रमाणे, दुपारचे जेवण सामान्य माणसाप्रमाणे तर रात्रीचे जेवण एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावे. असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच अर्थ सकाळचा नाश्ता खूप हेव्ही पोटभरीचा तर रात्रीचे जेवण हे अगदी कमी असावे. आपले आरोग्य आपल्या लाईफस्टाइलशी निगडीत असते. आहार-विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नाहीतर आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. आहाराचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आवर्जून टाळायला हव्यात असे सांगितले जाते.

रात्रीचा आहार हा हलका आणि सहज पचेल असा असावा. रात्री झोपताना जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. रात्री झोपल्यावर आपल्यी शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. अशावेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत.

रात्रीच्या वेळी जेवणांत कोणते पदार्थ खाणे टाळावे

१) गव्हापासून तयार केलेले पदार्थ: रात्रीच्या वेळी गव्हापासून तयार केलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. गहू आणि गव्हापासून तयार केलेले पदार्थ हे पचनास थोडे जड असतात त्यामुळे रात्रीच्या जेवणांत शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे. तसेच हे पदार्थ वेळीच पचले नाही तर आपल्याला अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे आजार यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात.

2) दही: दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी आवश्यक असते. पण दही पचायला काही प्रमाणात जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे शक्यतो टाळायला हवे. तसेच दही प्रकृतीने थंड असल्याने त्यामुळे सर्दी-कफ यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते.

3) मैदा: रात्रीच्या जेवणांत शक्यतो मैदा आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे. मैदा आणि मैद्यापासून तयार झालेले पदार्थ हे गव्हापेक्षा पचायला अधिकच जड असतात. यासाठी गव्हासोबातच मैदा देखील खाणे टाळावे.

4) गोड पदार्थ: काहीजणांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. साखर पचायला जड असल्याने ती शक्यतो सूर्यास्त होण्याच्या आत खायला हवीत असे सांगितलेले आहे. जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आपल्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. तसेच पचनक्रियेच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. यासाठीच जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे.

5) कच्चे सॅलॅड: रात्रीच्या जेवणासोबत कच्ची कोशिंबीर आणि सॅलॅड खाणे शक्यतो टाळावे. कच्चे सॅलॅड हे कोरडे आणि थंड असते. ज्यामुळे वात अनेक पटींनी वाढू शकतो. त्याऐवजी, आपण शिजवलेले किंवा ग्रील्ड केलेले तसेच वाफवलेल्या भाज्या खाव्यात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

3 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

9 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

17 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago