आरोग्य

उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या पोषक तत्वांच्या पावरहाऊस बनतात. इतकंच नाही तर उकडलेल्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया आणखी चांगली होते. अशात ५ खाद्य पदार्थांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पालक: पालक उकडल्यानंतर त्यातील ऑक्सालेट लेव्हल कमी होते. ज्यामुळे कॅल्शिअम आणि आयर्नचं अवशोषण वाढतं. ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शिअम आणि आयर्न कमी आहे अशा लोकांसाठी उकडलेली पालक जास्त फायदेशीर ठरते. तसेच उकडलेली पालक पचन होण्यासही सोपी असते.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं एक शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं. जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतं. टोमॅटो उकडल्याने हे तत्व आणखी मजबूत होतं.

ब्रोकली: ब्रोकल उकडल्याने ग्लूकोसायनोलेट्स रिलीज करण्यास आणि त्याचं बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते. ग्लूकोसायनोलेट्स कंपाउंडचा एक असा समूह आहे ज्याने कॅन्सर मुळापासून ठीक करण्यास मदत मिळते. उकडल्यानंतर ब्रोकली नरम होते ज्यामुळे ती चावणं आणि पचनही सहजपणे होते.

रताळी: रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. रताळी उकडल्याने यातील बीटा कॅरोटीनची शक्ती आणखी वाढते. यातून मिळणारं व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांसाठी, इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

3 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

4 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

4 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

8 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

8 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

11 तास ago